वायनाडमध्ये लोकशाही, नागपुरात चोरी?

- राहुल गांधींच्या दुटप्पी भूमिकेवर भाजपचा आकडेवारीसह हल्लाबोल

    24-Jun-2025
Total Views | 9

BJP attacks ON Rahul Gandhi
 
 
मुंबई : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात मतदारसंख्येत ८ टक्क्यांची वाढ झाली, हे संशयास्पद आहे,” असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. मात्र, त्यांच्या स्वतःच्या वायनाड मतदारसंघात याच काळात ७.७ टक्क्यांनी मतदार वाढले होते. मग वायनाडला लोकशाही आणि नागपुरात चोरी कशी?, असा सवाल उपस्थित करीत भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी जोरदार हल्लाबोल केला.
 
नवनाथ बन यांनी आकडेवारी सादर करीत राहुल गांधींच्या आरोपांची चिरफाड केली. ते म्हणाले, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात २०१९ मध्ये ३ लाख ८४ हजार ३५५ मतदार होते, तर २०२४ मध्ये हेच प्रमाण ४ लाख ११ हजार २४१ वर गेले, म्हणजेच सुमारे ७ टक्के वाढ झाली. याउलट, वायनाडमध्ये १ लाखांहून अधिक मतदारांची वाढ होऊन १३.५७ लाखांवरून १४.६२ लाखांपर्यंत संख्या गेली, म्हणजे ७.७ टक्के वाढ झाली. तरी वायनाडमध्ये ही वाढ लोकशाही, तर नागपूरमध्ये घोटाळा, हे तर्काला धरून नाही, असे बन यांनी नमूद केले.
 
मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसारख्या शहरी भागांत स्थलांतर, नवमतदारांची नोंदणी आणि घरांतून घरांत बदल यामुळे मतदारसंख्या ५ ते ८ टक्क्यांनी वाढत असते, याकडेही नवनाथ बन यांनी लक्ष वेधले. “आपल्या मतदारसंघात मतदार वाढले तर जागरूक जनता… आणि महाराष्ट्रात वाढले तर बनावट मतदार? Vote Theft नव्हे, Truth Theft सुरु आहे, आणि राहुल गांधी त्याचे शिल्पकार आहेत,” असा घणाघात नवनाथ बन यांनी केला. तसेच “तुमच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महाराष्ट्रात किती जागांवर पराभूत झाली, याची संपूर्ण आकडेवारी जाहीर करून दाखवा”, असे आव्हानही त्यांनी दिले.
 
वायनाड (राहुल गांधी यांचा मतदारसंघ)
 
➡️ 2019 मध्ये मतदार – 13,57,819
➡️ 2024 मध्ये मतदार – 14,62,423
➡️ वाढ –1,04,604 (7.7%)
 
नागपूर दक्षिण पश्चिम (देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ)
 
➡️ 2019 मध्ये मतदार – 3,84,355
➡️ 2024 मध्ये मतदार – 4,11,241
➡️ वाढ – 26,886 (6.99%)
 
(स्त्रोत: निवडणूक आयोग)
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121