सरकार कालही स्थिर होते आणि पुढेही राहील - देवेंद्र फडणवीस
10-Jan-2024
Total Views |
मुंबई : आज १० जानेवारीला महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रतेवर निकाल सुनावणार आहेत. या निकालाची संपुर्ण महाराष्ट्राला उत्सुकता आहे. अध्यक्ष काय निकाल देणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही यावर आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. ''आमचे सरकार कालही स्थिर होते आणि पुढेही स्थिरच राहील'' अस मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर हिवाळी अधिवेशनावेळी मॅरेथॉन सुनावणी घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने यावर ३१ डिसेंबर पर्यंत निकाल देण्याचे आदेश अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना दिले होते.
राहूल नार्वेकर बुधवारी १० जानेवारीला संध्याकाळी चार वाजता यावर निकालाचे वाचन करणार आहेत. या निकालावर शिवसेना पक्ष आणि उबाठा गटाते राजकीय भवितव्य अवलंबून आहे.