मुंबई : भारतात लवकरच 6G नेटवर्क सुरु होणार असून यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. देशात 6G नेटवर्क सुरु करण्यात येणार असून देशाच्या पंतप्रधानांनी याबाबत तसे सुतोवाच केले होते. ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार लवकरच 6G नेटवर्क सुरु करण्यासाठी तयारी करत आहे.
दरम्यान, 6G नेटवर्क सुरु करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून कर्मचारी नेमण्यात आले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी 5G नेटवर्कचे कौतुक करतानाच येऊ घातलेल्या 6G नेटवर्कमुळे आता अस्तित्वात असलेले इंटरनेट यामुळे १०० पट वेगवान होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तसेच, 6G नेटवर्कच्या आगमनाने विविध उद्योगांमध्ये लक्षणीय प्रगती होईल. तसेच, 6G तंत्रज्ञानाच्या मदतीने कारखाने दूरस्थपणे नियंत्रित केले जाऊ शकतात यावर पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात भर दिला होता. तथापि, 6G नेटवर्कच्या जागतिक रोलआउटसाठी सध्या कोणतीही निश्चित तारीख नसल्याचे काही तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ते २०३० मध्ये प्रत्यक्षात येऊ शकते. दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार संशोधन संस्था आणि जपानच्या ओसाका विद्यापीठाने या क्षेत्रात आधीच संशोधन आणि विकास सुरू केला आहे. भारताने 6G तंत्रज्ञानाच्या विकासाच्या दिशेने पावले उचलली आहेत.