देशात लवकरच 6G नेटवर्क सुरु होणार

    16-Aug-2023
Total Views | 96
prep-for-6g-in-india-is-on-says-pm-modi-how-different-is-it

मुंबई :
भारतात लवकरच 6G नेटवर्क सुरु होणार असून यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. देशात 6G नेटवर्क सुरु करण्यात येणार असून देशाच्या पंतप्रधानांनी याबाबत तसे सुतोवाच केले होते. ७६ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार लवकरच 6G नेटवर्क सुरु करण्यासाठी तयारी करत आहे.

दरम्यान, 6G नेटवर्क सुरु करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून कर्मचारी नेमण्यात आले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी 5G नेटवर्कचे कौतुक करतानाच येऊ घातलेल्या 6G नेटवर्कमुळे आता अस्तित्वात असलेले इंटरनेट यामुळे १०० पट वेगवान होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच, 6G नेटवर्कच्या आगमनाने विविध उद्योगांमध्ये लक्षणीय प्रगती होईल. तसेच, 6G तंत्रज्ञानाच्या मदतीने कारखाने दूरस्थपणे नियंत्रित केले जाऊ शकतात यावर पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात भर दिला होता. तथापि, 6G नेटवर्कच्या जागतिक रोलआउटसाठी सध्या कोणतीही निश्चित तारीख नसल्याचे काही तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यांचे म्हणणे आहे की, ते २०३० मध्ये प्रत्यक्षात येऊ शकते. दक्षिण कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार संशोधन संस्था आणि जपानच्या ओसाका विद्यापीठाने या क्षेत्रात आधीच संशोधन आणि विकास सुरू केला आहे. भारताने 6G तंत्रज्ञानाच्या विकासाच्या दिशेने पावले उचलली आहेत.


 
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

राष्ट्रहिताच्या विचारांनी ‘आयटीआय’मध्ये साजरा होणार शिवराज्याभिषेक दिन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने येत्या दि. ६ जूनपासून राज्यातल्या सर्व आयटीआय संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि देशासाठी समर्पणाची भावना रुजावी, पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, या हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवार, दि. ४ जून रोजी मंत्रालय..

मोठी बातमी! देशात

मोठी बातमी! देशात 'या' तारखेपासून होणार जनगणनेला सुरुवात, पहिल्यांदाच जातनिहाय नोंदी होणार

(Caste census) भारतात १ ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे. लडाख, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशांसह हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या बर्फाळ प्रदेश असलेल्या राज्यांमध्ये १ ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात केली जाणार आहे. तर, देशाच्या उर्वरित भागात १ मार्च २०२७ पासून जनगणना केली जाईल. जनगणनेमध्ये पहिल्यांदाच जातनिहाय नोंद होणार आहे. यावेळी जनगणनेच्या कागदपत्रांमध्ये जातनिहाय नोंदीसाठी कॉलम समाविष्ट करण्यात आला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121