मुंबई : राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.त्यामुळे महाराष्ट्राला पाणीपुरवठा करणारी धरणे पुर्णपणे भरुन वाहात असल्यामुळे आशादायी चित्रप एकीकडे असताना दुसरीकडे १९ जुलै रोजी रायगडमधील इर्शाळवाडीत घडलेली दुर्घटना मनाला चका लावून गेली. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील आणखी एका गावावर झोपेतच दु:खाचा डोंगर कोसळला. दरम्यान, याच विषयावरुन परंतु राजकारणापासून चार हात लांब असलेला अभिनेता संर्षण कऱ्हाडे याने एक पोस्ट केली आहे.
काय लिहिले आहे संकर्षणने पोस्टमध्ये?
“मी कधीही राजकीय नेत्यांवर भाष्यं करत नाही.. त्या संदर्भात पोस्ट तर करतच नाही.. कारण तो माझा प्रांत नाही .. मला त्यातलं ज्ञान नाही..”
पण, Social Media वर तीन वेगवेगळ्या पोस्टं पाहिल्या आणि खरंच छान वाटलं..
१) घटनास्थळी धावलेले , पुनर्वसनाचे आश्वासन देणारे “मुख्यमंत्री “..
२) त्यांच दुर्दैवी घटनांचा आढावा घेणारे , नियोजन पाहाणारे “उपमुख्यमंत्री”
आणि
३) “वंदे मातरम् “ विषयी संयममाने , योग्यं शब्दात समज देणारे “उपमुख्यमंत्री “ ..
तिघेही वेगळ्या पक्षाचे .. पण बरं वाटलं कि ; एकाच वेळी आमचं रक्षण, नियोजन आणि स्वाभिमान तिन्ही गोष्टिंविषयी तळमळीने कुणीतरी काम करतंय ..शेवटी तुम्हा आम्हाला काय हवं .. ?? तेच नं..!खरं सांगू..? आम्हाला तुम्ही सगळेच आवडता हो ..
- संकर्षण
कुठे आहे इर्शाळवाडी?
रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळगडाच्या पायथ्यापासून काही उंचीवर इर्शाळवाडी आहे. साधारणपणे ४८ कुटुंबांची ही वाडी असून त्यातील २५ ते ३० घरांवर दरड कोसळल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी विधानसभेतील निवेदनात दिली. पायथ्यापासून काही उंचीवर ही वाडी वसली आहे. मात्र, या वाडीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नसल्यामुळे एनडीआरएफ आणि प्रशासनाला जेसीबी किंवा पोकलेन घटनास्थळापर्यंत नेणं अशक्य झालं होतं.