नवी मुंबई : मोदी सरकारचे केंद्रात ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, एस जयशंकर यांनी मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या परराष्ट्र धोरणाबद्दल माध्यमांना माहीती दिली. यात बोलताना ते म्हणाले"तुम्ही अशा पंतप्रधानांना निवडून दिले आहे,ज्यांनी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनाअंतर्गत ८० कोटी जनतेला अन्न दिले आहे.
एवढी लोकसंख्या ही युरोप आणि उत्तर अमेरिकेची एकूण मिळून आहे.४० कोटी लोकांनी प्रधान मंत्री जण धन योजनेचा लाभ घेतला आहे. हि लोकसंख्या युरोपच्या लोकसंख्येइतकीच आहे. प्रधान मंत्री आवास योजनेचा लाभ १५ कोटी लोकांना मिळाला आहे. जी जपानच्या लोकसंख्येइतकीच आहे".पुढे ते म्हणाले, "त्यामुळे तुम्ही अशा पंतप्रधानांना निवडून दिले आहे,जो पूर्ण युरोप आणि उत्तर अमेरिकेला धान्य देऊ शकेन. युरोपला आर्थिक सहाय्य देऊ शकेल तर जपानला घरे देऊ शकतील".