ठाकरेंनी नैतिकतेच्या गोष्टी करु नये : मुख्यमंत्री शिंदे
11-May-2023
Total Views | 50
28
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंच्या प्रतिक्रियेचा समााचार घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले की, ठाकरेंनी नैतिकतेच्या गोष्टी करू नयेत. राज्यपालांचा निर्णय कोर्टाने अवैध ठरविला हे आम्ही मान्य करतो. तसेच, निवडणूक आयोगाने आम्हाला राजकीय पक्ष असल्याची मान्यता दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आमचंच सरकार राहणार आहे. त्यामुळे उध्दव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिली आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी टीकास्त्र डागले.