जर आपण कोणाला विचारले की, तुम्ही तुमच्या उत्पन्नाचे नियोजन कसे करता, तर आपल्याला काही साचेबद्ध उत्तरं मिळतील. जसे की, नवीन घर विकत घेणे, नवीन कार, मुलांचे शिक्षण किंवा बाहेरगावी फिरायला जाणे. आपल्यापैकी बरेच जणं अशा प्रकारे आपले आर्थिक नियोजन करत असतात. संशोधनातून असे लक्षात आले आहे की, लोक आनंदी परिणामांसाठी योजना आखतात, जेणेकरून त्याचा फायदा निवृत्तीनंतर होतो.
तथापि, मी या वस्तुस्थितीवर पुरेसा भर देऊ शकत नाही की, तुमच्या निवृत्तीचे नियोजन लवकर करणे आवश्यक आहे. कारण, निवृत्ती हे एकमेव आर्थिक ध्येय आहे, ज्यासाठी कोणालाच कर्ज मिळत नाही. सर्वात सोप्या स्तरावर, सेवानिवृत्ती नियोजनामध्ये निवृत्तीदरम्यान तुमच्या खर्चाचा अंदाज लावणे, पुरेसा निधी जमा करणे आणि ते खर्च ‘कव्हर’ होईल, अशा प्रकारे गुंतवणूक करणे समाविष्ट आहे. हा लेख दुसर्या भागावर लक्ष केंद्रित करतो, म्हणजे, तुमच्या सेवानिवृत्त वर्षांमध्ये उत्पन्न निर्मितीसाठी एक निधी सज्ज ठेवणे. पारंपरिक शहाणपण असे सूचित करते की, या प्रक्रियेचे वास्तविक परिणाम तुम्ही जमा केलेल्या निधीच्या आधारावर लक्षणीय बदलू शकतात.
जर तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीसाठी लवकर नियोजन करण्यास सुरुवात केली नाही, तर तुम्ही आवश्यक निधी जमा करू शकणार नाही आणि त्यामुळे तुमच्या निवृत्तीनंतरच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या निवृत्तीबद्दल चिंताग्रस्त होण्याआधी, जर मी तुम्हाला सांगितले की, कमी निधी जमा करूनही तुमचे निवृत्तीचे जीवन आरामदायी असू शकते? ‘दि थ्री बकेट स्ट्रॅटेजी’ आणि ‘स्किल मॉनेटाईजेशन’ या दोन ‘हॅक’चा वापर करून सेवानिवृत्तीतील आर्थिक गरजांची चिंता कमी करू शकता.
प्रथम, ‘थ्री बकेट स्ट्रॅटेजी’ कशी कार्य करते, ते पाहू. ही रणनीती तुमच्या सेवानिवृत्तीच्या निधीच्या, मालमत्तेचे वाटप वेगवेगळ्या बकेट्समध्ये करण्याचे समर्थन करते.
सेवानिवृत्तीची सुरुवातीची वर्षे (तीन-पाच वर्षे म्हणा) ‘कव्हर’ करण्यासाठी असलेली पहिली ‘बकेट’ प्रामुख्याने अल्पमुदतीच्या कर्जासारख्या सुरक्षित साधनांमध्ये गुंतवणूक करेल. दुसरी ‘बकेट’ मध्यवर्ती मुदतीसाठी (म्हणजे १०-१२ वर्षे) मध्यम मुदतीच्या कर्ज आणि ‘इक्विटी’च्या मिश्रणात गुंतवणूक करू शकते. तिसरी ‘बकेट’ जी १५ हून अधिक वर्षांनंतर काढून घेईल, ती ‘इक्विटी’मध्ये गुंतवणूक करू शकते. या दृष्टिकोनाचा उद्देश बाजारातील अस्थिरता संतुलित करणे आणि दीर्घ कालावधीत ‘कॉर्पस’ उपलब्धता पसरवणे आहे. उदाहरणाच्या आधारे हा दृष्टिकोन उत्तम प्रकारे कसा कार्य करेल, ते पाहू.
‘मिस्टर ए’ वयाच्या ४०व्या वर्षी सेवानिवृत्तीची योजना सुरू करतात. सहा टक्के महागाई दर लक्षात घेता, त्यांचा सध्याचा मासिक खर्च रु. ५० हजार रुपये इतका आहे व ६०व्या वर्षी निवृत्तीच्या पहिल्या महिन्यात त्यांना १.६ लाख रुपये लागू शकतील. पुढील ३० वर्षांमध्ये हा खर्च भरून काढण्यासाठी ते रु. ४.४ कोटींचे नियोजन ‘कॉरपस’मध्ये जमा करून ‘थ्री बकेट्स स्ट्रॅटेजी’ त्याला कशी मदत करू शकते, ते बघूया.
दुसरे म्हणजे, एखादी व्यक्ती त्यांच्या कौशल्यांमध्ये विविधता आणण्यासाठी अनेक प्रयत्न करू शकते. हे योगप्रशिक्षक बनण्यापासून ते उत्पादक, प्रशिक्षक, स्वयंसेवक आणि बरेच काही असे असू शकते. पण, आपण अर्थपूर्ण योगदान कुटुंबासाठी देऊ शकत नसल्यामुळे आपली स्वत:ची किंमत कमी होत चालली आहे, असे काहींना वाटते. परिणामी घरचे आणि शारीरिक आरोग्यही बिघडते, ज्यामुळे सेवानिवृत्त जीवनाची गुणवत्ता आपसुकच कमी होते. अनेक कौशल्ये असल्याने निवृत्तीमध्ये केवळ उत्पन्नाचे प्रवाहच मिळू शकत नाही, तर एखाद्याला अचानक सर्व कर्तव्यांपासून मुक्ती मिळाल्यावर उद्देशाची भावनादेखील मिळते. खरंच, सेवानिवृत्तीचा सर्वात मोठा धोका हा एक निधी जमा होण्यापुरता मर्यादित नसून आयुष्यभर फक्त एकच काम करण्याच्या वृत्तीतही आहे.
(लेखक पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडचे सीईओ आहेत.)