भगवान प्रभू श्रीरामाचे, रामसेतूचे अस्तित्व नाकारण्यापासून ते आता राममंदिराचा मुद्दा महत्त्वाचा की बेरोजगारी, महागाई असा प्रश्न काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी उपस्थित केला. त्यामुळे काँग्रेसपासून ते मॅक्स मुलरसारख्या बनावट विमर्शकार, अगणित कम्युनिस्ट आणि सनातन धर्माचा द्वेष करणार्यांपासून भगवान श्रीरामही वंचित राहिले नाहीत. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांवर शंबुकाची जात पाहून, हत्येचा चुकीचा आरोप नजीकच्या काळात लावला गेला. अशा रचलेल्या खोट्या विमर्शाचा सखोल अभ्यास करून, योग्य माहिती असणे आवश्यक आहे आणि ज्याची आपण सखोल चर्चासुद्धा केली पाहिजे. म्हणूनच आगामी राममंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा लेखप्रपंच...
भगवान श्रीरामांचे वनवासातील जीवन
भगवान श्रीराम वनात संयमी तपस्वी जीवन जगले. ते जिथे गेले, तिथे तीन लोकांसाठी त्यांनी झोपडी बांधली. ते जमिनीवर झोपायचे. रोज कंदमुळे खात असे आणि रोज आध्यात्मिक साधना करत असे. त्यांची वेषभूषासुद्धा साधारण होती. त्यांनी आपल्या धनुष्य बाणांनी जंगलातील प्रत्येकाचे राक्षस आणि प्राणघातक प्राण्यांपासून संरक्षण केले. या काळात त्यांनी सर्व ऋषी-मुनींच्या आश्रमांचे राक्षसांपासून रक्षण केले. अत्र्यांना राक्षसांपासून मुक्त केल्यानंतर, भगवान श्रीराम दंडकारण्य जिल्ह्यात गेले. जेथे प्रामुख्याने आदिवासी (जनजाती) वस्ती होती. बाणासूरच्या अत्याचारातून मुक्ती दिल्यानंतर, भगवान श्रीराम दहा वर्षे आदिवासींमध्ये राहिले. वनवासींव्यतिरिक्त त्यांनी निषाद, मातंग आणि इतर समाज अंगानाही धर्म, कर्म आणि वेदांचे शिक्षण दिले.
वनवासींचे आराध्य दैवत भगवान श्रीराम यांनी १४ वर्षे वनवास भोगला. त्यापैकी १२ वर्षे ते जंगलात राहिले. त्यांच्या १२व्या वर्षांच्या शेवटी देवी सीतेचे अपहरण करण्यात आले. अशा प्रकारे त्यांनी पुढील दोन वर्षे सीतामातेचा शोध घेण्यात, वानर सैन्य गोळा करून रावणाशी युद्ध केले. १४ वर्षांत त्यांनी धर्मानुसार संपूर्ण समाजासाठी खूप काम केले. त्यामुळे श्रीराम संस्कृती आणि धर्म आजही आपल्या देशात आणि जगभरात पाहायला मिळतो.
जंगलात राहून त्यांनी वनवासींना धनुष्यबाण कसे बनवावेत, अंगावर वस्त्र कसे परिधान करावे, गुहेत कसे राहावे, धर्माच्या मार्गावर चालताना त्यांचे विधी कसे करावेत, याचेही शिक्षण दिले. त्यांनी वनवासींमध्ये कुटुंबाची संकल्पना रुजवली आणि त्यांना एकमेकांचा आदर करायला शिकवले. त्यांच्यामुळेच आपल्या देशातील वनवासी ही आता केवळ एक जमात राहिलेली नसून, एक समाज आहे. देशभरातील वनवासी चालीरिती आणि परंपरांमध्ये एकरूपतेसाठी ते जबाबदार आहेत. त्यांच्या १४ वर्षांच्या वनवासात भारतातील सर्व हिंदू समाज आणि पंथांना एकत्र करणारे भगवान श्रीराम हे पहिले महापुरूष होते. त्यांनी आणि सर्व भारतीयांनी एक भारत निर्माण करून अखंड भारत निर्माण केला. आजही भारतातील तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ आणि कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये तसेच नेपाळ, लाओस, कंबोडिया, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, बाली, जावा, सुमात्रा आणि थायलंड यांसारख्या देशांमध्ये श्रीरामाची पूजा केली जाते आणि या देशांच्या लोकसंस्कृती आणि ग्रंथांमध्ये ते आढळतात.
चित्रकूटमध्ये राहूनही त्यांनी समाजातील सर्व घटकांना धर्म आणि कर्म शिकवले. प्रभू रामाने भारतभर प्रवास करून भारतीय वनवासी, जमाती, डोंगरावर राहणारे या सर्वांना सत्य, प्रेम, आदर आणि सेवेचा संदेश दिला. परिणामी, जेव्हा भगवान श्रीरामाने रावणाशी युद्ध केले, तेव्हा सर्व जाती प्रभू रामाच्या पाठीशी उभ्या राहिल्या.शंबुक कथा अर्थहीन आणि संदर्भाबाहेर आहे. त्यात स्पष्टता आणि सत्यता नाही. सुरुवातीलाच हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की, रामायणाच्या अंदाजे ३०० भिन्न आवृत्त्या आहेत. वाल्मिकी ऋषींनी मूळ आणि अस्सल रामायण लिहिले. ’वाल्मिकी रामायणा’त शंबुकचा उल्लेख नाही. ऋषी वाल्मिकी भगवान रामाची स्तुती या पृथ्वीवरील एकमेव आदर्श पुरूष (मर्यादा पुरुषोत्तम) म्हणून का करू शकतात, जर प्रभू राम जातिवादी होते तर? आणि ते स्पष्ट करतात की, प्रभू श्रीरामाने कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. प्रभू राम सनातन धार्मिक होते, ते भेद कसा करू शकतात? शिवाय ’श्रीमद्भागवता’मध्ये शंबुकाच्या वधाचा उल्लेख नाही, जे पुन्हा एक प्रामाणिक पुराण आहे. महाभारतातील रामायण, वनपर्वाच्या पुनरावृत्तीमध्येही या घटनेचा उल्लेख नाही.
वाल्मिकी रामायणात माता शबरी यांचाही उल्लेख आहे. जी जन्मतः शूद्र होती, असं म्हटलं जातं. परंतु, त्यांना सर्वात आदरणीय संन्याशांपैकी एक मानले जाते. त्रेतायुगात शूद्रांना तपश्चर्या करण्याची परवानगी नव्हती, असा खोटा विमर्श मांडला गेला आहे, तर माता शबरीला का परवानगी होती? हे समजणं खूप महत्त्वाचं आहे आणि इथेच खोटा विमर्श गढणार्यांचा पर्दाफाश होतो.‘वाल्मिकी रामायण’ हा भगवान रामाचा इतिहास आहे. रामायणाच्या इतर बहुतेक आवृत्त्या अतिशयोक्त, मिथक जोडलेल्या, काही प्रमाणात अविश्वसनीय आणि काल्पनिक आहेत. इतिहासकारांसाठी भगवान राम ही वस्तुस्थिती आहे. जनमानस त्यांना आराध्य दैवत व त्यांची पूजा करत असल्याने त्यांच्या कथेत अनेक दंतकथा आणि खोटा विमर्श जोडला गेला आहे, हे लक्षात घ्यायला हवे.होय, शंबुक कथा मूळ वाल्मिकी रामायणात नसून, अध्यात्म रामायणाच्या उत्तरकांडात (७४-७८) आहे; परंतु घटना खरी नाही. इतिहासकारांच्या मते, इसवी सनाच्या पाचव्या शतकानंतर शंबुकाची कथा रामायणात आली. उत्तरकांडातील आशय, शब्दसंग्रह आणि वाक्यरचना रामायणाशी विसंगत आहे. या विभागात मूळ रामायणाच्या विरोधात काही शंकास्पद आणि नवीन सामग्री आढळून येते.
एका रामायणात असंही सांगितलं आहे की, शंबुक हा शूद्रही नव्हता. जांभ (शंबुक) हे एका राक्षसाचे नाव होते. तो त्याच्या नावासारखाच दिखाऊ होता. भगवान शंकराची पत्नी पार्वतीला प्राप्त करण्याच्या उद्देशाने ही तपश्चर्या करण्यात आली. मग शंबुकाला मारणे योग्य नाही का? नारद ऋषींच्या पुराव्यांनुसार, भगवान राम सर्वांसाठी उदात्त, निष्पक्ष आणि दयाळू होते.वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था नाही.सत्य हे आहे की, वैदिक काळात जातिव्यवस्था नव्हती. केवळ वर्णव्यवस्था प्रचलित होती. ज्याचा आजच्या सामाजिक जातिरचनेशी काहीही संबंध नाही. जेव्हा मुघल आणि इंग्रजांनी शांतताप्रिय भारतीयांवर हल्ले करून त्यांच्यात असुरक्षितता निर्माण केली, तेव्हा जातिव्यवस्था प्रस्थापित झाली. काही निरक्षर पुरोहितांनी रामायणासारख्या ग्रंथांमध्ये जातिव्यवस्थेला प्रोत्साहन देणारे श्लोक जोडले. निहित स्वार्थ लक्षात घेऊन, हे अंदाज लावले गेले.श्रीरामांनी अनेक शूद्रांच्या घरी भोजन केले. निषाद राजला ते मित्र आणि सहकारी मानत. ’राम चरितमानस’मध्ये श्रीराम माँ शबरीला भक्ती ज्ञान (नवधा भक्ती) देतात. त्यांच्या व्यवसायाची तुलना श्रीरामाच्या व्यवसायाशी करतात आणि हे सर्व सुंदर किस्से सिद्ध करतात की, प्रभू रामाने कधीही भेदभाव केला नाही.यजुर्वेदानुसार शूद्र म्हणजे शूर, मेहनती, निष्ठावान आणि अत्यंत कठीण कार्येही पूर्ण करू शकतो, असा आहे . हे भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे (१४.३)
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्॥
गुण (प्रतिभा) आणि कर्म (कृती) सर्व वर्णांची व्याख्या करतात. तो वारसा हक्काने मिळत नाही. आपण त्या सर्व महान लोकांबद्दल बोलू शकतो, जे जन्मतः शूद्र होते; परंतु कष्टाने क्षत्रिय किंवा ब्राह्मण झाले. याज्ञवल्क ऋषींनी राजा जनकाच्या सभेत स्पष्टपणे सांगितले होते की, “ब्राह्मण हा त्याच्या जन्माने नव्हे, तर त्याच्या कर्माने ठरतो.” इतर सर्वांसाठीही असेच आहे.मोठ्या संख्येने जगभरातील प्रभू श्रीराम यांच्यावरील भक्ती आणि प्रेमाच्या भावनेचा द्वेष करणारी मंडळी चुकीचा अर्थ लावत आहेत. भगवान श्रीरामाची बदनामी करण्यासाठी, रचल्या जाणार्या खोट्या कथांवरून त्यांच्याबद्दल व सनातन संस्कृतीबद्दल द्वेष दिसून येतो. अशा सर्व लोकांना लवकरच खात्री होईल की, जगभरात आत्मविश्वास वाढत आहे आणि दि. २२ जानेवारी २०२४ पासून मोठ्या प्रमाणात वाढ होईल व सुवर्ण युगाकडे पुन्हा वाटचाल सुरू होईल.
पकंज जयस्वाल