ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंनी बदलली साक्ष

    29-Nov-2023
Total Views |
Sena MLAs Disqualification hearing


मुंबई
: शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर सध्या मॅरेथॉन सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाच्या वकिलांकडून ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंवर प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची भंबेरी उडताना दिसत आहे. बुधवारी सुनावणीदरम्यान एका प्रश्नावर गोंधळलेल्या सुनील प्रभूंनी दुसऱ्या सत्रात आपली साक्ष बदलली.
 
बुधवारी, दि. २९ नोव्हेंबर रोजी १२.३० वाजता शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी पुन्हा एकदा शिंदे गटाच्या वकिलांनी सुनील प्रभू यांची उलटतपासणी घेतली. २२ जून २०२२ रोजी आपण जे पत्र एकनाथ शिंदे यांना पाठवले, ते कोणत्या माध्यमातून पाठवले, असा सवाल शिंदेंचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. त्यावर 'व्हॉट्सएपच्या माध्यमातून', असे उत्तर प्रभूंनी दिले.
 
त्यावर या पत्राची मूळ प्रत कुठे आहे, असा प्रतिप्रश्न करण्यात आला. मूळ प्रत रेकॉर्डवर आहे, असे प्रभूंनी सांगितले. मात्र, एकनाथ शिंदे यांना अशी कोणतीही मूळ प्रत पाठवण्यात आली नसल्याचा दावा जेठमलानी यांनी केला. हा दावा खोटा असल्यास व्हॉट्सएपद्वारे पत्र पाठवल्याचे पुरावे सादर करा, असे जेठमलानी म्हणाले.त्यावर गांगरून गेलेल्या प्रभूंनी दुसऱ्या सत्रात आपली साक्ष बदलण्याची विनंती केली. जेवणाच्या सुटीमध्ये मी पडताळणी केल्यानंतर हे पत्र ईमेलद्वारे पाठवल्याचे आढळले. त्यामुळे माझी साक्ष बदलण्यात यावी, असे प्रभू म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना तशी परवानगी दिली.

१ डिसेंबरपासून ठाकरेंच्या वकिलांना संधी

सध्याच्या वेळापत्रकानुसार ३० नोव्हेंबरपर्यंत शिंदे गटाच्या वकिलांना ठाकरे गटाची उलटसाक्ष घेता येईल. त्यानंतर १ ते ११ डिसेंबरपर्यंत ठाकरे गटाचे वकील शिंदे गटाची उलटसाक्ष घेतील. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना ३१ डिसेंबरपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद संपल्यावर निकाल देण्यास २० ते २५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा सचिवालयाकडून सर्वोच्च न्यायालयाला वेळ वाढवून देण्याची विनंती केली जाणार आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121