अमरावतीतून २ बिबट्याच्या पिल्लांची सुखरूप सुटका

बघ्यांच्या गर्दीमुळे बचाव कार्यात अडथळे

    02-Sep-2022
Total Views | 34
लोएपद
 
 
मुंबई (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यातील महादेव खोरी भागातील वनविभागाच्या लागवड शेताजवळ बिबट्याची दोन पिल्ले गुरवारी दि. १ सप्टेंबर रोजी आढळून आली. या पिल्लांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. सकाळी लागवड शेतातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही पिल्ले आढळून आली. तात्काळ वन विभागाच्या रेस्क्यू युनिटला कळविण्यात आले. रेस्क्यू युनिटच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी जाऊन या दोन बिबट्यांच्या पिल्लांना ताब्यात घेतले.
 
 
घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्यामुळे बचाव कार्यात अडथळे आले, परंतु, वन विभागाने शिताफीने कारवाई करत या पिल्लांना सुखरूप ताब्यात घेतले. या दोनही पिल्लांची पशुवैद्यकीय तपासणी करण्यात आली. ही पिल्ले निरोगी असून या पिल्लांची आई सोबत पुनर्भेट घडवून देण्याचा प्रयत्न गुरवारी दि. १ सेप्टेंबर रोजी रात्री करण्यात आला. परंतु, या दरम्यान मादी बिबट्या त्या भागात नसल्याचे समोर आले. या पुनर्भेटीसाठी पुन्हा एका प्रयत्न करण्यात येणार आहेत. या पिल्लांमध्ये एक नर आणि एका मादी पिल्लाचा समावेश आहे. तर, तिसरे पिल्लू बिबट्या मादी सोबतच असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक वनसंरक्षक ज्योती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे, आणि रेस्क्यू युनिटचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन नेवारे हे आपल्या इतर वन कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
नवी मुंबई विमानतळ सप्टेंबर अखेरीस सुरु होणार ; राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा

नवी मुंबई विमानतळ सप्टेंबर अखेरीस सुरु होणार ; राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची घोषणा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्द्घाटन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याची घोषणा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत केली. हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे विमानतळ असून एकाचवेळी ३५० विमाने या विमानतळावर उभी करता येतील एवढी क्षमता याची आहे. तसेच वर्षाला सुमारे ९ कोटी प्रवासी हवाई वाहतुकीचा आनंद यामुळे घेऊ शकतील, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. या विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होत आला असून त्याचे उ‌द्घाटन सप्टेंबरअखेरीस केले जाणार आहे...

बुलेट ट्रेन प्रकल्पात दमण गंगा नदीवरील पूल पूर्ण ; बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण झालेला १६ वा नदीपुल

बुलेट ट्रेन प्रकल्पात दमण गंगा नदीवरील पूल पूर्ण ; बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पूर्ण झालेला १६ वा नदीपुल

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात दमण गंगा नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी गुजरातमध्ये नियोजित २१ नदी पुलांपैकी हा सोळावा नदी पूल आहे. वलसाड जिल्ह्यात असलेले सर्व पाचनदी पूल आता पूर्ण झाले आहेत. संपूर्ण कॉरिडॉरवर एकूण २५ नदी पूल बांधले जात आहेत. वलसाड जिल्ह्यातील एमएएचएसआरमार्ग दादरा आणि नगर हवेलीमधील 4.3 किमीसह सुमारे ५६ किमी लांबीचा आहे. हा मार्ग जारोली गावातून सुरू होतो आणि वाघलदरा गावात संपतो. या मार्गात वापी बुलेट ट्रेन स्टेशन, ३५० मीटर लांबीचा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121