डोंबिवली : मध्य रेल्वेकडून रेल्वे रूळालगत राहणा:या रहिवाशांना घर रिकामे करण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे. या रहिवाश्यांच्या पाठीशी भाजपने ठामपणे उभे राहून त्यांना दिलासा दिला आहे. भाजपा आमदार रविंद्र चव्हाण आणि त्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत त्यांना निवदेन दिले आहे. दरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या वसाहतीतील रहिवाशांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे.
भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांच्यासोबत कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक साई शेलार, मंदार टावरे, भाजपा डोंबिवली शहर सचिव राजू शेख, माजी वार्ड अध्यक्ष कपिल देव शर्मा , मारूती कांबळे, गणपत कदम यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. 1965-70 या कालवधीत वसलेल्या डोंबिवलीतील शेलार चौक, इंदिरा नगर, त्रिमूर्तीनगर यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील अनेक झोपडपट्टीवासीयांना रेल्वेने नोटीस देण्यास सुरूवात केली आहे. या वसाहती पन्नास वर्षांपूर्वीच्या असून त्याला संरक्षण मिळायलाच पाहिजे अशी ठाम भूमिका आमदार रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासमोर मांडली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील डोंबिवली परिसरात इंदिरानगर प्रभाग असून तिथे पूर्ण झोपडपट्टी परिसर आहे. याठिकाणी पाच ते साडेपाच हजार झोपडया असून त्यामध्ये अंदाजे पंचवीस हजारांच्या आसपास लोक वास्तव्य करून आहेत. ही झोपडपट्टी 1970 पासून रेल्वेच्या जागेवर आहे. सुमारे 26 एकर जागेमध्ये ही वसलेली आहे. रेल्वेची अधिकारी घरोघरी जाऊन सव्र्हे करून रहिवाश्यांना नोटीस देत आहेत. तसेच कागदपत्रे जमा करीत आहेत . एकीकडे अधिका:यांकडून पुर्नवसन हा आमचा विषय नाही असे सांगितले जाते. रेल्वे कोणताही मोबदला देणार नाही. मग हा सव्र्हे कशासाठी केला जात आहे असा प्रश्न ही भाजपाचे माजी नगरसेवक साई शेलार यांनी उपस्थित केला आहे. तसेच अचानक नागरिकांना ही घरे खाली करावी लागली तर त्यांनी जायचं कुठे असा प्रश्न आहे. त्यामुळे रेल्वे , राज्य सरकार आणि महापालिकेचे अधिकारी यांनी एकत्र येऊन यावर तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते स्वर्गीय रामभाऊ कापसे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील , स्वर्गीय शिवाजी दादा शेलार, माजी मंत्री व आमदार रविंद्र चव्हाण हे पूर्वीपासूनच झोपडपट्टीवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. या पुढील काळात ही झोपडपट्टीला कोणताही धोका होऊ देणार नाही अशीच भूमिका भाजपने घेतली असल्याचे भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सांगितले.
----------------------------------------------------------