ब्रुसेल्स : (EAM S. Jaishankar's Big warning to Pakistan) पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताने पाकपुरस्कृत दहशतवादाविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर सध्या पाकिस्तान-भारत सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. पाकिस्तानने पुन्हा अशा प्रकारच्या कुरापती केल्या तर भारत थेट पाकिस्तानात घुसून हल्ला करेल असा थेट इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे. 'दहशतवादी पाकिस्तानात कुठेही असले तरी भारत सडेतोड प्रत्युत्तर देईल', असे एस जयशंकर यांनी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये एका मुलाखतीत बोलताना म्हटले आहे.
दहशतवादी पाकिस्तानातील कुठल्या भागात आहेत याची पर्वा करणार नाही
"भविष्यात पाकिस्तानने अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया किवा कुरापती करण्याचा प्रयत्न केल्यास दहशतवादी पाकिस्तानातील कुठल्या भागात आहेत याची भारत पर्वा करणार नाही. मग ते पाकिस्तानात कितीही आतमध्ये असले तरी आम्ही आत घुसून प्रत्युत्तर देऊ. पाकिस्तान हा एक असा देश आहे जो दहशतवादाचा वापर देशाच्या धोरणाचे साधन म्हणून करत आहे. हाच कळीचा मुद्दा आहे. मात्र, जर दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेल्या प्रत्युत्तराला त्यांनी तणावाचे कारण म्हटले तर हे आम्ही सहन करणार नाही", असं मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले.
एस. जयशंकर म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारताच्या लढाऊ विमानांनी आणि क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. त्यामुळे पाकिस्तान गुडघे टेकत शस्त्रसंधीसाठी तयार झाला. राफेल असो की इतर क्षेपणास्त्रे हे किती प्रभावी होते, त्याचा पुरावा पाकिस्तानचे नष्ट झालेले हवाईतळ आहेत.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\