परिक्षा रद्द झाल्यामुळे आमचा तणाव नाहिसा झाला; पंतप्रधानांच्या विद्यार्थ्यांशी गप्पा

    03-Jun-2021
Total Views | 57
modi_1  H x W:



सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधानांचा अचानक संवाद
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : “बारावीची परिक्षा रद्द करण्याचा तुमचा निर्णय अतिशय योग्य आहे. कारण सिर सलामत तो पगडी हजार. हा निर्णय घेतल्यामुळे आमचा तणाव आता नाहिसा झाला आहे”. अशा शब्दात सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितले.
 
 
 
देशातील करोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सीबीएसई मंडळाची बारावीची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शुक्रवारी बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसोबत पुढील चर्चा करण्यासाठी सीबीएसईने ऑनलाईन बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानकपणे सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. यावेळी पालकांनीदेखील परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.
 
 
 
 
 
 
 
 
विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का
 
 
 
पंतप्रधान मोदी या बैठकीमध्ये सहभागी होतील, हे ठरलेले नव्हते. त्यामुळे बैठकीदरम्यान अचानक समोर पंतप्रधान आल्याने विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, त्याचवेळी थेट पंतप्रधानांशी बोलायला मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
 
 
 
सर्वप्रथम एका विद्यार्थ्याने तुमचा निर्णय अतिशय योग्य असल्याचे सांगितले. कारण सिर सलामत तो पगडी हजार या म्हणीची आठवण करून दिली. त्याचप्रमाणे तुम्ही आमचे सर्वांत मोठे प्रेरणास्रोत आहात, असेही म्हटले. त्यानंतर पंतप्रधानांनी विद्यार्थ्याने सांगितलेल्या म्हणीचा आधार घेऊन हेल्थ इज वेल्थ हे महत्वाचे असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे अभ्यासाव्यतिरिक्त व्यायाम करता की नाही, खरे सांगा; तुमचे आई-वडीलही येथेच आहेत, मी त्यांना विचारेल अशी कोपरखळीही मारली.
 
 
 
हिमाचल प्रदेशातील सोलन येथील विद्यार्थीनी कशिश नेगी या विद्यार्थीनीने पंतप्रधानांसोबत अशा पद्धतीने भेट झाल्याचा आनंद झाल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे परिक्षा रद्द करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभारही मानले. गेल्या दीड वर्षांपासून संभ्रमाचे वातावरण असल्याने तणाव निर्माण झाला होता, भविष्याविषयी काळजी वाटत होती. मात्र, आता हा निर्णय घेतल्याने आम्ही पुढील तणावमुक्त झाल्याचे तिने नमूद केले.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

मेट्रो व मोनोच्या ३१ स्थानकांलगत ई स्वॅप बॅटरी स्टेशन्स

जागतिक पर्यावरण दिनासाठी सगळे जग सज्ज होत असताना मुंबईभर विस्तारलेल्या मेट्रो व मोनोरेलच्या स्थानकांवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लि.ने (एमएमएमओसीएल) जपानच्या होंडा मोटर कंपनी लिमिटेडची उप कंपनी असलेल्या होंडा पॉवर पॅक एनर्जी इंडिया प्रा. लि.शी भागीदारी केली आहे. या हरित उपक्रमांतर्गत २५ मेट्रो स्थानके व ६ मोनो रेल स्थानकांच्या ठिकाणी होंडाचे हे ॲडव्हान्स्ड बॅटरी स्वॅपिंग तंत्रज्ञान बसविण्यात येईल. यातून एमएमएमओसीएलला तिकीटाव्यतिरिक्त सुमारे ₹३० ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121