वीणा मलिक, (बिग बॉसमध्ये भारतात पैसे आणि नाव कमवून भारतालाच भलेबुरे बोलणारी पाकिस्तानची दीडदमडीची नटी.) तर तिने अॅडॉल्फ हिटलरचे विधान ट्विट केले- “जगभरातल्या सगळ्या ज्यूंना मारणार. पण, काही ज्यूंना जीवंत ठेवणार. कारण, त्यांनी जगाला सांगू दे की, आमच्या ज्यूंची कशी कत्तल झाली.” तिच्या या ट्विटवरून तिची मानसिकता कळते. माणसावरच्या अत्याचाराचे, निष्पापांच्या खुनाचे, मुलीबाळींच्या वरच्या दुःखद अन्यायाचे समर्थन करणे ही धार्मिकता नाही, तर अधर्म आहे. आता आपल्या देशातही ‘सेव गाझा’ म्हणत काही लोक रस्त्यावर उतरतील. ‘इस्लाम खतरे में’ म्हणत त्यांची डोकी भडकवली जातील. पण, यांना कधी कळणार की, जगाला जगायचे असेल तर ‘दहशतवाद खतरे में’ यायला हवा.
इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष इतिहासकालीन आहे. त्याबद्दल नव्याने काही सांगण्यासारखे नाही. मात्र, या सगळ्या घडामोडीत पाकिस्तानने पुन्हा आपली जागतिक समज दाखवून दिली आहे. आपण इस्रायलच्या विरोधात असून, पॅलेस्टाईनचे त्यातही गाझा पट्टीतील मुस्लिमांचे समर्थक आहोत, हे दाखवण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी ट्विट केले की, “तुम्ही आमचं पाणी जबरदस्तीने घ्या, आमच्या झाडांना आग लावा, घरं उद्ध्वस्त करा, नोकर्या बळकावा, आमच्या आईचा खून करा, देशाला उद्ध्वस्त करा, आम्हाला उपाशी ठेवा, आम्हाला अपमानित करा आणि या सगळ्याच्या बदल्यात आम्हाला एक रॉकेट मारल्याबद्दल तुम्हीच आम्हाला दोषी ठरवा - नॉम चोम्स्की.” वर या विधानासोबत नॉम चॉम्सकीचा फोटोही लावला आहे. आता यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण, जे विधान इमरान खान यांनी नॉम चोम्स्कीच्या नावावर खपवले, ते विधान नॉम चोम्स्की यांचे मुळी नाहीच. नॉम यांनी पूर्वीच एका लेखात म्हटले आहे की, हे असे विधान त्यांनी पॅलेस्टाईनमधल्या कोणत्या तरी आंदोलनात एका माणसाच्या हातातील फलकावर पाहिले होते. त्यामुळे हे विधान नॉम चोम्स्की यांचे नाही. अमेरिकन विचारवंताने कधीही उद्धृत न केलेले विधान घेऊन इमरान यांनी पॅलेस्टाईनसाठी समर्थन व्यक्त केले. त्यामुळे त्यांच्या आणि पाकिस्तानी प्रशासनाच्या एकंदर ज्ञानावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मुस्लीम धर्माचा सवतासुभा घेऊन पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला. त्याच वेळी पाकिस्तानची नियती ठरली गेली की, जगातील इतर मुस्लीम देशांची हाजी हाजी केल्याशिवाय किंवा री ओढल्याशिवाय पाकिस्तान जगू शकत नाही. इस्रायलने पॅलेस्टाईनवर यशस्वी हल्ला केला आणि जगभरातील मुस्लिमेतर देशांनी त्याला मूक समर्थन केले. यावेळी पॅलेस्टाईन मुस्लिमांना समर्थन केलेच पाहिजे, हे पाकिस्तानचे मत असणारच! बरं, आधी ‘हमास’सारख्या संघटनांनी इस्रायलवर हल्ला केला होता तेही ज्यूंच्या धार्मिक स्थळावर. याकडे पाकिस्तान आणि इमरान कानाडोळा करत आहेत. तसे पाहायला गेले तर इतरही मुस्लीम देशे चिंतेत आहेत. पण, मग या सगळ्यांची चिंता जगभरात ठरावीक ठिकाणी का असते? अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी पुन्हा लोकांचे जगणे मुश्कील केले आहे. खून अपहरण, बॉम्बस्फोट यांनी अफगाण रक्तबंबाळ झाला आहे. यात अत्याचार हातो तो मुस्लीम बांधवांवरच. मात्र, कुणाही मुस्लीम राष्ट्रांना याबद्दल काही चिंता वाटत नाही. काल-परवाच एक अहवाल प्रकाशित झाला, ज्यामध्ये चीनमध्ये मुस्लिमांवर होणार्या अत्याचाराबद्दल वास्तव आणि तेही पुराव्यासकट लिहिले गेले आहे. त्याबद्दलही कुणीही मुस्लीम राष्ट्र काहीच बोलत नाही. पाकिस्तानमध्ये चिनी कंपन्या आहेत. त्यांनी पाकिस्तानमधील आपल्या कंपनीत नमाज पडण्यास बंदी घातली आहे.
धर्मकर्मास बंदी घातली म्हणून कुणीही चीनला जाब विचारत नाही. दुसरीकडे रोहिंग्या मुसलमान निर्वासित आहेत. पण, त्यांना मुस्लीम राष्ट्रही स्वीकारत नाहीत. या सगळ्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून पाकिस्तानच्या वल्गना काय, तर आम्ही पॅलेस्टाईनच्या सोबत आहोत. पाकिस्तान आणि तत्सम देशांचे सगळे धार्मिक चोचले केवळ भारतासाठीच. का तर इथे ‘सेव गाझा’ लिहिलेले बनियन घालणारे आणि दहशतवादी इशरत जहाँच्या नावाने रुग्णवाहिका मिरवणारे राजकीय सत्ताधारी मंत्री बनतात. इथेच राहून इथेच खाऊन जगभरात मुस्लिमांबाबत काहीही झाले तर लाखोंचा मोर्चा आंदोलन करणारे तोडफोड करून देशाचे नुकसान करणारे लोकही इथे आहेत. या अशा लोकांवर कायदेशीर गुन्हा दाखल केला की, ‘असहिष्णू देश’ म्हणत देशाची निंदा करणारे तथाकथित निधर्मी लोकही इथेच आहेत. मुख्य मुद्दा असा की, पाकिस्तानमध्ये आता इस्रायलविरोधात म्हणे तीव्र जनमत आहे. वीणा मलिक, (बिग बॉसमध्ये भारतात पैसे आणि नाव कमवून भारतालाच भलेबुरे बोलणारी पाकिस्तानची दीडदमडीची नटी.) तर तिने अॅडॉल्फ हिटलरचे विधान ट्विट केले- “जगभरातल्या सगळ्या ज्यूंना मारणार. पण, काही ज्यूंना जीवंत ठेवणार. कारण, त्यांनी जगाला सांगू दे की, आमच्या ज्यूंची कशी कत्तल झाली.” तिच्या या ट्विटवरून तिची मानसिकता कळते. माणसावरच्या अत्याचाराचे, निष्पापांच्या खुनाचे, मुलीबाळींच्या वरच्या दुःखद अन्यायाचे समर्थन करणे ही धार्मिकता नाही, तर अधर्म आहे. आता आपल्या देशातही ‘सेव गाझा’ म्हणत काही लोक रस्त्यावर उतरतील. ‘इस्लाम खतरे में’ म्हणत त्यांची डोकी भडकवली जातील. पण, यांना कधी कळणार की, जगाला जगायचे असेल तर ‘दहशतवाद खतरे में’ यायला हवा.