भंडारा- विहिरीत पडून वाघाच्या दोन बछड्यांचा करुण अंत

    12-May-2021
Total Views | 156
tiger cub _1  H



मुंबई (प्रतिनिधी) -
भंडारा जिल्ह्यातील गराडा/बूज गावाजवळील एका उपसा सिंचनाच्या विहिरीमध्ये बुधवारी सकाळी वाघाचे दोन बछडे मृतावस्थेमध्ये आढळून आले. विहिरीला कठडा नसल्याने या बछड्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा कठडे नसलेल्या विहिरींमध्ये पडून मृत्युमुखी पडणाऱ्या वन्यजीवांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
 
 
 
पहाटे धावण्यासाठी गेलेल्या तरुणांना गराडा/बूज गावाच्या तलावाजवळ टेकेपार उपसा सिंचनच्या विहरीमध्ये वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. याची माहिती वन विभागाला मिळताच अधिकारी त्याठिकाणी आले. त्यांनी विहिरीमधून दोन बछड्यांचे मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळी विहिरीजवळ वाघिणीचे पगमार्क आढळून आले आहेत. त्यामुळे तिने पिल्लांना विहिरीबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केल्याची शक्यता आहे. मंगळवारी भंडारा जवळील बेला येथे वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले होते. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे उपसा विहिरीत सहा फुटांपर्यंत पाणी भरले होते. त्यामुळे विहिरीत पडल्यानंतर पाण्यात बुडून पिल्लांचा करुण अंत झाला. बछडे मादी प्रजातीचे असून त्यांचे वय दोन महिने होते.

अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121