अलिबाग - किहीम किनाऱ्यावर कासवांचा पाळणा हलला; कासवांची पिल्लं समुद्रात रवाना

    25-Apr-2025
Total Views | 187
turtle nest in kihim



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
रायगड जिल्ह्यातील पर्यटकांनी गजबजलेल्या किहीमच्या किनाऱ्यावर शुक्रवार दि. २५ एप्रिल रोजी सागरी कासवांच्या पिल्लांचा जन्म झाला (turtle nest in kihim). ४ मार्च रोजी या किनाऱ्यावर सागरी कासवाच्या मादीने घरटे केले होते (turtle nest in kihim). या घरट्यामधून शुक्रवारी बाहेर पडलेली ६८ पिल्ले कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाने समुद्रात रवाना केली. (turtle nest in kihim)
 
 
राज्याच्या किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमधील काही प्रमुख किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची घरटी आढळतात. रायगडमधील चार, रत्नागिरीतील २३ आणि सिंधुदुर्गमधील ३० किनाऱ्यांवर आॅलिव्ह रिडेल प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी येतात. रायगडमधील दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि मारळ या उत्तरेकडील किनाऱ्यांवर सागरी कासवांची घरटी प्रामुख्याने आढळतात. मात्र, ४ मार्च रोजी अलिबाग तालुक्यातील किहीमच्या किनाऱ्यावर सागरी कासवाचे घरटे आढळून आले. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या मादीने भर उन्हात लोकांच्या समक्षच किनाऱ्यावर खड्डा करुन त्यात अंडी घातली होती. कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाकडून हे घरट संरक्षित करण्यात आले होते.
 
 
संरक्षित केलेल्या या घरट्यामधून शुक्रवारी साधारण ५० दिवसांनी पिल्लांचा जन्म झाला. शुक्रवारी सकाळी आणि त्यानंतर सायंकाळी बाहेर पडलेल्या ६८ पिल्लांना वन कर्मचाऱ्यांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने समुद्रात सोडले. हे घरटे इन-सेटू पद्धतीने संरक्षित करण्यात आले होते, म्हणजेच अंड्यांना आहे त्याच ठिकाणी ठेवून त्याभोवती जाळी लावून घरट्याला संरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे त्यात नेमकी अंडी होती आणि त्यातून अजून किती पिल्लं बाहेर पडू शकतात याचा अंदाज देता येता नाही, असे कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागाच्या विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121