मुंबई : राज्याची सूत्र ज्या मंत्रालयातून हलवली जातात त्या ठिकाणी पुन्हा एकदा दुर्घटना होता होता टळली आहे. आज ट्रान्सफॉर्मर जळाल्याने काही वेळासाठी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वेळीच सर्व स्विच बंद केल्याने मोठा धोका अनर्थ टळला आहे. मंत्रालयात आज ट्रान्सफॉर्मर जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
मागील वर्षी 30 मार्च 2020 रोजी व 2012 रोजी मंत्रालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मोठं नुकसान झालं होतं. आज शॉर्ट सर्किट होऊन हा अनर्थ टळला आहे. पण मंत्रालयात वायरिंग शॉर्ट सर्किट तसेच ट्रान्सफॉर्मरवर अतिभार आल्याने अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे हजारो लोकं आपली काम घेऊन मंत्रालयात येतात आणि हे असं होणं राज्याचा दृष्टीने फार गंभीर आहे .त्यामुळे मंत्रालयातील विद्युत व्यवस्थेकडे नीट लक्ष देणे गरजेचे असल्याचे चित्र सध्या आहे.