
पुणे : पर्यावरण म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित परिसर जो पृथ्वीवरील जीवनावर परिणाम करतो आणि टिकवून ठेवतो. पर्यावरण हे विविध भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांपासून बनलेले आहे जे एकमेकांशी आणि मानवी क्रियाकलापांशी संवाद साधतात. पर्यावरणावर सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक घटकांचा देखील प्रभाव पडतो जे मानवी मूल्ये, दृष्टिकोन, वर्तन आणि संस्थांना आकार देतात. पर्यावरण अभ्यास हे असे शैक्षणिक क्षेत्र आहे जे पर्यावरण आणि त्याच्या समस्यांचा बहुविद्याशाखीय आणि समग्र दृष्टिकोनातून पद्धतशीरपणे अभ्यास करते. पर्यावरण अभ्यास हे पर्यावरणीय समस्यांची कारणे, परिणाम आणि उपाय समजून घेण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी, मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी नैसर्गिक विज्ञान, मानविकी आणि सामाजिक विज्ञानांमधील ज्ञान एकत्रित करते.
मानव इतर प्राण्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ व अधिक ज्ञानी समजून जगण्याच्या अधिकारासाठी, तो इतर प्राणी आणि पर्यावरण यांच्या क्षतीबद्दल निष्काळजी राहतो. त्या राहण्याच्या दृष्टिकोनाला मानवकेंद्रवाद म्हणतात. माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी इतर जीवसृष्टी व वृक्षवल्ली यांच्या हानीकडे दुर्लक्ष करतो, ही मानव केंद्रवादाची मुख्य लक्षणे होत.
गेल्या दोन-अडीचशे वर्षांत मानवाने जंगलतोड, शिकार, खोदकाम, भूजलाचा अवास्तव वापर, ॲटम बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब इत्यादींद्वारे विषारी वायूचे केलेले अभिसरण यांद्वारे पर्यावरणाचा विनाश केवळ अतृप्त तृष्णा शमविण्यासाठी केला आहे. मानवाची विकासाची अतृप्त भूक जणूकाही या परिस्थीतीस मुख्य कारणीभूत ठरली आहे. या संबंधी अनेक प्रश्न उद्भवतात. जसे की, पर्यावरणऱ्हासाचे मुख्य कारण नेमके काय? मानवाचा पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे काय? ज्यामुळे अशा घटना घडतात. पर्यावरणाची अतिशय झपाट्याने होणारी घसरण ही मुख्यत: मानवकेंद्रित आहे का? यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
पृथ्वीच्या इतिहासात मानवाव्यतिरिक्त कोणत्याही प्राण्यांनी तिच्या भूपृष्ठावर अतोनात बदल केलेले नाहीत. पृथ्वीवर मानवाचे अस्तित्व सु. एक लक्ष वर्षांपासून आहे, असे म्हटले जाते; परंतु या कालावधीत मानवाने पृथ्वीचे भूपृष्ठ आणि अंतराळ यांत एवढा बदल केलेला नाही, जेवढा तो गेल्या दोन-अडीचशे वर्षांत झाला आहे. दोन शतकांतील औद्योगिक क्रांतिमुळे त्याने निसर्गस्रोतांची कमतरता, पृथ्वीतलावर परिस्थितिजन्य क्षालन न होणाऱ्या पाऊलखुणा सोडत आहे. जसे की, विषारी वायूंचे उत्सर्जन, अविघटनशील पदार्थ. परंतु या परिस्थितीचे कारण काय? काय या गतीला आवर न घालणारी वैज्ञानिक प्रगती जबाबदार आहे? किंवा ते आपण चुकीने घेतलेल्या मूल्यांच्या धोरणात आहे? या व अशा अनेक प्रश्नांवर विचार केल्यानंतर असे लक्षात येते की, पाश्चात्त्य संस्कृतीत सुरुवातीपासूनच मानवकेंद्री दृष्टीकोन रुजवलेला आहे आणि पाश्चात्त्यीकरणाचा प्रभाव संपूर्ण जगावर पडलेला असल्याने या पर्यावरण ऱ्हासाचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत.
पर्यावरण तत्त्वज्ञानात नुकतेच झालेले काही बदल : अशा प्रकारे पाश्चात्त्य जगाने, जे वारसा म्हणून त्यांच्या संस्कृतीने सुरुवातीपासून जे मानवकेंद्री मूल्ये जोपासलेले आहे, आणि या दृष्टिकोनानुसार संपूर्ण विश्वात इतर प्राण्यांपेक्षा मानव हा अत्यंत उच्च दर्जाचा अत्यंत महत्त्वपूर्ण किंवा मध्यवर्ती जीव आहे. या दृष्टिकोनानुसार मानव हा निर्सगापासून केवळ वेगळाच नाही, तर तो निसर्गाहून श्रेष्ठ आहे. ह्या निर्सगातील इतर सर्व घटक उदा., वनस्पती, प्राणी, खनिज द्रव्ये ही सर्व मानवासाठीच आहेत. मानव ह्या सर्वांचा वापर स्वत:च्या फायद्यासाठीच करू शकतो. या दृष्टिकोनामुळे मागच्या दोन-अडीचशे वर्षांमध्ये पर्यावरणाचे खूप शोषण झालेले दिसून येत आहे. असेच काही बदलेलेले दृष्टीकोन खाली देत आहे. परंतु या संदर्भातील नवनवे धोरणसुद्धा पूर्णपणे पर्यावरणकेंद्रित नाही. यातसुद्धा काही प्रमाणात मानवाचा स्वार्थ आणि स्वःताचे संतुष्टीकरण दिसून येत आहे. ब्रॅयन नॉर्टन, क्रीस्टन श्रॅडर आणि जॉन पसॉमोर हे मानवकेंद्र दृष्टिकोनाचे समर्थक आहेत.
पर्यावरणीय मानवतावाद : पर्यावरणीय मानवतावाद हा मानवाच्या प्रगतीला लगाम लावून नियंत्रित करतो व त्याला नवी योग्य दिशा देण्यावर भर देतो. जेणेकरून सर्व मानवप्रजाती जास्तीत जास्त काळ टिकून राहील, या ध्येयाने स्वतः पुर्नपरिसर परिचीतता करून घेण्याची शिफारस हा पर्यावरणवाद करतो. हा पर्यावरणीय मानवतावाद ज्या बोधवाक्यावरून उभारलेला आहे, ते म्हणजे “जर तुम्ही चुकीच्या दिशेने जात असाल, तर तुमच्या गतीचे काही मूल्य नाही, म्हणून गतीबरोबर दिशानिश्चिती आवश्यक असते”.
हा पर्यावरण मानवतावाद सामाजिक आचारणातील बदलाचा पुरस्कार करतो, परंतु हा सुचविलेला बदल पर्यावरणाची काळजी घेतो म्हणून नव्हे. परंतु मानवाच्या जीवनाला पर्यावरणबदलामुळे येणाऱ्या समस्यांचे निराकारण मात्र आहे, थोडक्यात असे की, पर्यावरणीय मानवतावाद हा केवळ माणसाच्या फायद्यासाठीच पर्यावरण परिसंरक्षणाचा पुरस्कार करतो.
ग्रीक तत्त्वज्ञ प्रोटॅगोरस याने असे विधान केले आहे की, “माणूस हाच सर्व बाबींचे मोजमाप आहे.” या विधानाचा प्रभाव पर्यावरण मानवतावादीतसुद्धा आहे. हे धोरण निसर्गास केवळ साधनमूल्यता प्रदान करते आणि निसर्गातील सजीव-निर्जीव यांच्या अंगीभूत मूल्यांना ते मान्यता देत नाही. म्हणून पर्यावरणीय मानवतावादसुद्धा मानवालाच सृष्टीचा केंद्रबिंदू मानून सगळीकडे एक साधनमूल्य दृष्टिकोनातून बघतो.
पर्यावरणाचा सामाजिक-आर्थिक विकास आणि मानवतेच्या भविष्याशी संबंध जोडतात. पर्यावरण विकास ही पर्यावरणाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता लोकांच्या जीवनमानात सुधारणा करण्याची प्रक्रिया आहे.
शाश्वतता म्हणजे भविष्यातील पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता सध्याच्या पिढीच्या गरजा पूर्ण करण्याचे तत्व. पर्यावरणीय अभ्यास पर्यावरण, विकास आणि शाश्वतता यांच्यातील परस्परसंवाद, तडजोड आणि समन्वयाचा शोध घेतात आणि त्या साध्य करण्याचे मार्ग आणि साधने शोधण्याचा प्रयत्न करतात.
मयुर बाळकृष्ण बागुल, पुणे
व्यवसायिक सामाजिक कार्यकर्ते
चलभाषा - ९०९६२१०६६९