शहापूरमध्ये लावा पक्ष्यांची शिकार

    23-Apr-2020
Total Views | 655

 bird_1  H x W:

 
 
वन विभागाकडून शिकारी अटकेत
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - वन विभागाने शहापूर तालुक्यातून बुधवारी लावा पक्ष्यांची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याजवळून चार मृत लावा पक्षी आणि शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले. प्रसंगी आरोपींनी जंगलात वणवा लावल्याचेही शक्यता आहे. वनाअधिकारी आरोपींची चौकशी करत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
 

bird_1  H x W:  
 
 
लाॅगडाऊनच्या काळात वन्यजीव गुन्हांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वन्यजीव शिकारीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. बुधवारी शहापूर तालुक्यामधील उंबरखांड गावामधून पक्ष्यांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले. उंबरखांड वनपरिक्षेत्रामध्ये गस्तीवर असणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना येथील जंगलात वणवा लागल्याचे दिसले. लागलीच त्यांनी त्या जागेच्या दिशेने धाव घेतली. जागेवर पोहोचल्यानंतर वनकर्मचाऱ्यांना तिथे चार ते पाच माणसांचा वावर दिसला. चौकशी करण्यासाठी त्या माणसांना बोलावले असता त्यांनी तिथून पळ काढला. वनकर्मचाऱ्यांनी त्यामधील तीघांना पकडून त्यांच्याजवळील सामानाची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडील पिशवीमध्ये चार मृत लावा पक्षी आणि शिकारीचे साहित्य आढळून आले.
 
 
 
 
 
आरोपींची चौकशी केली असता त्यांनी हे पक्षी बेचकीच्या साहाय्याने खाण्यासाठी मारल्याची कबुली दिल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख यांनी दिली. या आरोपींनी जंगलात वणवा लावल्याची शक्यता असून त्यासंदर्भात आम्ही चौकशी करत आहोत. त्यांच्यावर 'वन्यजीव संरक्षण कायद्या'अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींमध्ये चंदन सोमा कामडी (वय ३५), भाऊ सोमा कामडी (वय २५) आणि मनोज बालाराम जाधव (वय १४ ) यांचा समावेश आहे. यामधील अल्पवयीन आरोपीला सोडण्यात आले आहे. ही कारवाई वनाधिकारी योगेश पाटील, पन्नेलाल बेलडार, रुपेश देशमुख आणि गणेश भोये यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121