सिद्धूचे पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळले

    15-Feb-2019
Total Views |


 


पुलवामा हल्ल्यामागे पाकिस्तान नसल्याची अप्रत्यक्ष क्लीनचिट

 

चंदीगड : पंजाबचे कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेस नेता नवज्योतसिंग सिद्धू यांचे पाकिस्तान प्रेम पुन्हा एकदा उफाळून आले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत त्यांनी देशवासीयांच्या दुःखावर मीठ चोळले आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात नसल्याची अप्रत्यक्ष क्लीनचिट त्यांनी पाकिस्तानला दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एकाही शब्दाने पाकिस्तानचा निषेध केला नाही किंवा या हल्ल्यात पाकिस्तानला दोषी धरले नाही. यावरून देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

 

प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, दहशतवादाला कोणताच देश, धर्म आणि जात नसते. या हल्ल्यामागे जैश-ए- मोहम्मद ही दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे समोर आले आहे. ही संघटना पाकिस्तान लष्कर व आयएसआय यांच्या इशाऱ्यावर नाचते हे सर्वश्रुत असताना सिद्धू यांचे विधान पाकिस्तानला क्लीनचिट देण्यासारखे आहे. असा सूर सोशल मीडियावर उमटत आहे.

 

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यासंबंधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सिद्धू म्हणाले, "पुलवामा येथील भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. मात्र, दहशदवाद्यांची कोणताच देश, धर्म आणि जात नसते." दरम्यान, या दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी निषेध केला असला तरी पाकिस्तानला त्यांनी जबाबदार धरले नाही. यामुळे सिद्धू यांच्या विरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!; भारताचे पाकवर टीकास्त्र

"ट्रम्प आणि मुनीर यांची भेट पाकिस्तानसाठी लज्जास्पद!"; भारताचे पाकवर टीकास्त्र

(India on Trump-Munir meet) पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नुकतीच व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प आणि असीम मुनीर यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. तसेच त्यांची ही भेट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांऐवजी लष्करप्रमुख ट्रम्प यांना भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीवर आता भारताने प्रतिक्रिया देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे...

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121