उदयनराजेंच्या गादीला धक्का : कॉलर खाली मिशीवर ताव

    24-Oct-2019
Total Views | 47



सातारा : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजपवासी झालेल्या साताऱ्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज यांचा लोकसभा पोटनिवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. केवळ चारच महिन्यांपूर्वी उदयनराजे याच मतदारसंघातून भर राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर लोकसभेत प्रचंड मताधिक्क्याने निवडून गेले होते. मात्र, यंदाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा तब्बल ८५ हजार, ६८९ मतांनी पराभव केला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उदयनराजे यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली होती, तर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्यासाठी भर पावसात सभा घेतली होती.

 

"आपण सुचवलेले एकही जनहिताचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत असताना त्यांनी केले नाही," असा आरोप उदयनराजे यांनी केला होता. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली होती. त्यांनी राष्ट्रवादीचा आणि लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. भाजपनेही त्यांचा प्रचार करताना ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरेपूर प्रचार केला होता. मात्र, साताऱ्याच्या जनतेने पक्षीय निष्ठेला जास्त पसंती दिली आहे, असे दिसते आहे.

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121