पाकिस्तानच्या 'एनएसजी' प्रवेशाला अमेरिकेचा नकार

    31-May-2018
Total Views | 37


वॉशिंग्टन डी.सी. : अणु पुरवठा गटामध्ये (एनएसजी) प्रवेश करण्याची तीव्र इच्छा मनात बाळगून बसलेल्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना अमेरिकेने आज पुन्हा खोडा घातला असून एनएसजीमध्ये प्रवेशासाठी पाकिस्तान केलेला अर्ज अमेरिकने नाकारला आहे. अमेरिकेमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय आण्विक प्रसार संस्थेने यासंबंधी आपला विरोध दर्शवला असून पाकिस्तानला एनएसजीमध्ये प्रवेश देणे सध्या योग्य नाही, असे या संस्थेनी म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तानने एनएसजी प्रवेशासाठी केलेला अर्ज अमेरिकेने नाकारला आहे.

पाकिस्तानच्या अर्जावर विचार करण्यासाठी तसेच यावर अभ्यास करण्यासाठी म्हणून आण्विक प्रसार संस्थेने अमेरिकेतील इन्स्टिट्यूट फॉर सायन्स अॅण्ड इंटरनॅशनल सिक्युरिटी (आयएसआयएस) या संस्थेला निर्देश दिले होते. यानंतर आयएसआयएसच्या डेविड अलब्राइट, सारा बुर्कहार्ड आणि फ्रँक पॅबियन यांनी पाकिस्तानसंबंधी तयार केलेला अहवाल आज या संस्थेपुढे सादर केला. यामध्ये आयएसआयएसने पाकिस्तानची तुलना थेट उत्तर कोरियाशी करत, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अणु उर्जा वापराविषयी माहिती दिली आहे. पाकिस्तानने गेल्या चार दशकांमध्ये आपल्या देशामध्ये सातत्याने अणु उर्जा वापरला आणि त्यापासून शस्त्र बनवण्याला चालना दिली असल्याचे यात म्हटले गेले आहे. याचबरोबर येथे सरकारबरोबरच नागरिक आणि सैन्य हे देखील स्वतंत्रपणे या अणु उर्जेवर काम करत असून त्यापासून उर्जा आणि शस्त्र तयार करण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यामुळे पाकिस्तानला सध्या तरी एनएसजीमध्ये प्रवेश देणे योग्य नाही, असे स्पष्ट मत अहवालामध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

याचबरोबर पाकिस्तान येत्या काही दिवसांमध्ये आपल्या देशामध्ये दोन मोठ्या अणु भट्ट्या उभारण्यासाठी कार्य करत आहेत. या अणु भट्ट्यांची क्षमता ही गरजेपेक्षा अधिक असून पाकिस्तान या अणु भट्ट्यांची निर्मिती का करत आहे ? यावर अमेरिका, चीन आणि इतर देशांनी पाकिस्तान चौकशी करावी व पाकिस्तानने देखील या देशांना आपल्या प्रकल्पाची माहिती देऊननंतरच हे प्रकल्प पूर्ण केले पाहिजे, असे देखील या अहवालात म्हटले आहे. दरम्यान यानंतर उपग्रहाद्वारे घेण्यात आलेले पाकिस्तानचे काही छायाचित्र देखील यावेळी दाखवण्यात आले व यानंतर पाकिस्तान हा अर्ज अमेरिकेकडून रद्द करण्यात आला.

संस्थेनी प्रसिद्ध केलेली पाकिस्तानची उपग्रहाद्वारे घेतलेली छायाचित्रे : 











संस्थेनी सादर केलेला संपूर्ण अहवाल :


अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं  काय घडलं?

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. ..

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121