भारताने आपल्या अण्वस्त्रांमध्ये २०२४ सालच्या १७२ वरून २०२५ साली १८० एवढी वाढ केली आहे. त्याचप्रमाणे भारताने प्रगत अणुवितरण प्रणालीदेखील विकसित करून पाकिस्तानवर वरचष्मा कायम ठेवला आहे, असा निष्कर्ष स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (एसआयपीआरआय) च्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आला आहे.
Read More
गेलेे काही आठवडे आपण बलुचिस्तान, सिंध, वायव्य सरहद्द प्रांत इत्यादी पाकिस्तानी प्रांतांमधल्या बंडाळ्यांची स्थिती समजून घेत आहोत. एक बलुचिस्तान सोडला, तर इतर प्रांत स्वबळावर स्वतंत्र होऊ शकतील, अशी स्थिती नाही. इकडे भारताने हाणलेल्या जबर तडाख्याने पाकिस्तान घायाळ झालाय, असे भासते. पण, तिकडे पाकिस्तानी सेना नेतृत्व ‘आयएसके’ला पुढे करून बलुचिस्तानला तर चेपतेच आहे, पण अफगाणिस्तानावरही वरचढ होऊ पाहत आहे. जाणून घेऊया हा सत्तेच्या सारी
'दंगल' हे २०१६ मध्ये प्रदर्शित झालेलं आमिर खानचं सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरलं. भारतातच नव्हे तर जगभर या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र, हा चित्रपट पाकिस्तानमध्ये कधीच प्रदर्शित झाला नाही. अनेकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं होतं. अखेर, वर्षांनंतर आमिर खानने यामागचं कारण ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात उघड केलं आहे.
(EAM S. Jaishankar's Big warning to Pakistan) पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताने पाकपुरस्कृत दहशतवादाविरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर सध्या पाकिस्तान-भारत सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. पाकिस्तानने पुन्हा अशा प्रकारच्या कुरापती केल्या तर भारत थेट पाकिस्तानात घुसून हल्ला करेल असा थेट इशारा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिला आहे. 'दहशतवादी पाकिस्तानात कुठेही असले तरी भारत सडेतोड प्रत्युत्तर देईल', असे एस जयशंकर यांनी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समध्ये एका मुलाखतीत बोलताना म्हटले आहे.
अमेरिका-पाकिस्तान यांच्यात दि. 6 जून रोजी झालेल्या चर्चेनंतर, अमेरिकन काँग्रेसचे सदस्य ब्रॅड शेरमन यांनी सोशल मीडियावर दहशतवादविरोधी चर्चांवर प्रकाश टाकणारी महत्त्वाची माहिती दिली आहे. शेरमन यांच्या पोस्टला उत्तर देताना काँग्रेस खा. शशी थरूर यांनी “डॉ. शकील आफ्रिदी यांच्या सुटकेसाठी अमेरिकेने केलेली मागणी पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधातील स्वागतार्ह पाऊल आहे,” असे म्हटले आहे.
तालिबानशासित अफगाणिस्तानशी भारतासह पाकिस्तान आणि चीननेही आपले द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टीने अलीकडे पद्धतशीर पाऊले उचललेली दिसतात. त्याचे एकमेव कारण म्हणजे, अफगाणिस्तानचे भारतीय उपखंडातील भूराजकीय स्थान. याअनुषंगाने भारत-अफगाणिस्तान संबंधांचे आकलन करणारा हा लेख...
(US Congressman Brad Sherman Slams Pakistan Delegation) पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरअंतर्गत झालेल्या लष्करी कारवाईनंतर भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाविरोधातील भूमिका मांडण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवली. त्यानुसार या शिष्टमंडळांनी विविध देशांना भेटी दिल्या. दरम्यान, भारताच्या या निर्णयाचे अनुकरण करत पाकिस्ताननेही वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या खासदारांच्या शिष्टमंडळांना पाठवल्याचे पाहायला मिळाले.
काँग्रेस नेत्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग असलेले त्यांचेच आणखी एक नेते सलमान खुर्शीद यांच्यावर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड केल्याबद्दल आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चे समर्थन केल्याबद्दल नुकताच हल्ला चढवला. थरूर यांनी ज्याप्रमाणे अशा नेत्यांना त्यांचे नाव न घेता उत्तर दिले, त्याचप्रमाणे खुर्शीद यांनीही तेच केले. यासोबतच त्यांनी आपली वेदना व्यक्त करताना असा प्रश्नही विचारला की, “देशभक्त असणे इतके कठीण आहे का?” हा फक्त एक प्रश्नच नाही, तर एक वेदना असल्याचे दिसते. अर्थात, काँग्रेसमध्ये हे नवीन नाही. यापूर्वी गांध
(Who is Madam N )पाकिस्तानसाठी हेरगिरी आणि भारताविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रावर कारवाई सुरू असतानाच, या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. भारतीय इन्फ्लुएन्सर्सना पाकिस्तानात सहज प्रवेश मिळवून देणाऱ्या आणि 'आयएसआय'च्या सहाय्याने गुप्त नेटवर्क तयार करणाऱ्या एका महिलेचे नाव समोर आले आहे. नोशाबा शहजाद असं तिचं नाव असून ती ‘जय्याना ट्रॅव्हल अँड टुरिझम’ या ट्रॅव्हल एजन्सीची मालक आहे आणि पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध व्यावसायिक मानली जाते.
भारत-पाकिस्तान फाळणीपूर्वी सिंध, पंजाब, बलुचिस्तान आणि उत्तर पश्चिम प्रांतांमध्ये हिंदू लोकसंख्या लक्षणीय होती. त्याठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे होती. फाळणीनंतर मोठ्या प्रमाणात हिंदू भारतात स्थलांतरित झाले. परिणामी, अनेक मंदिरे वापराविनाच राहिली. काहींना नुकसान पोहोचले आणि काहींवर अवैध कब्जे झाले. पाकिस्तानमधील हिंदू मंदिरांच्या संरक्षणासाठी न्यायालयीन आदेश असूनही, स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागांने दुर्लक्ष केल्यामुळे, अनेक मंदिरांवरचे अवैध कब्जे आजही कायम आहेत. नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे, ते पाकिस्तान
(Pakistani Spy Punjab Youtuber Jasbir Singh Arrested) पंजाब पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली रूपनगर येथून जसबीर सिंग नावाच्या आणखी एका युट्यूबरला अटक केली आहे. मोहाली येथील स्टेट स्पेशल ऑपरेशन्स सेल (SSO) ने जसबीर सिंग विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राजस्थानमधून अटक केलेल्या हसीनला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हसीनला पाकिस्तानसाठी हेरगिरी आणि डीआरडीओ अधिकाऱ्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पटियाला हाऊस कोर्टाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने केलेल्या हवाई हल्यात पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारत-पाकच्या चार दिवसांच्या हल्ल्याच्या चकमकीतील ५० वर्षातील ही सर्वात मोठी लढाई होती. युद्धात दोन्ही देशांनी एकमेकांच्या हवाई हल्ल्याच्या क्षमतेची परीक्षा घेत एकमेकांच्या लष्करी तळांवर हल्ला केला. परंतु आता उपग्रह प्रतिमांमध्ये सत्य स्पष्ट झाले आहे. युद्धादरम्यान, हल्ल्यांसाठी दोन्ही देशांनकङून क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करण्यात आला. दोन्हीही देशांनी एकमेकांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवल्याचा दावा केला. परं
(India-Pakistan Tensions) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाने पाकिस्तानी प्रशासन आणि लष्करी यंत्रणांना पूर्णपणे हादरवून टाकले होते. तरीही पाकिस्तानचे भारताविरुद्ध सतत चिथावणीखोर विधाने करणे आणि पोकळ धमक्या देणे अद्याप सुरुच आहे. आणि आता पुन्हा चीनचे नाव पुढे करुन एक नवी धमकी दिली आहे. "जर भारताने सिंधू जल करारावरील स्थगिती मागे घेतली नाही, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह अडवू शकतो, ज्यामुळे भारताला नुकसान सहन करावे लागेल", अशी पोकळ धमकी पाकिस्तानने द
पाकिस्तानसोबत रशियाने 2.6 अब्ज डॉलर्सचा करार केल्याच्या वृत्तांना रशियाने स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. तसेच, ही माहिती पूर्णतः खोटी असून भारत-रशिया मैत्रीत फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया रशियाने दिली आहे. यामुळे पाकिस्तानी माध्यमांच्या खोटा चेहरा जगासमोर उघड झाला आहे.
(Colombia Withdraws Statement On Pak Casualties After India's Objections) भारत - पाकिस्तान संघर्ष सुरु असताना 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यातील मृतांविषयी कोलंबियाने संवेदना व्यक्त केल्या होत्या. मात्र कोलंबियाने आता यासंदर्भातील आपले विधान मागे घेतले आहे. शशी थरुर यांच्या नेतृत्वाखाली असणारे सर्वपक्षीय शिष्टमंडळ तेथे गेल्यानंतर कोलंबियाला उपरती झाल्याचे समजते आहे.
पहलगाम हल्ल्याविषयी भारताने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर कोलंबियाने भारतास पाठिंबा दिला आहे. कोलंबिया सरकारचा हा निर्णय सकारात्मक असल्याचे भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेते शशी थरूर यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे कोलंबियाच्या पाकिस्तानसोबत उभे राहण्याच्या निर्णयाविषयी थरूर यांनी कोलंबियातच जाहिर नाराजी व्यक्त केली होती.
पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथे जेव्हा हल्ला झाला, तेव्हा दहशतवाद्यांनी लोकांची धर्म विचारून हत्या केली. ते हिंदू आहेत का, मुस्लिम आहेत का, हे तपासून मग त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यांचा उद्देश म्हणजे भारतातील सामाजिक सलोखा बिघडवणे. हा दहशतवाद्यांचा तसेच पाकिस्तानचा हेतू स्पष्ट होता. धर्माच्या नावावर होणारा दहशतवाद आता थांबायलाच हवा, असा इशारा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सिएरा लिओन येथून पाकिस्तानला दिला. तर याच पार्श्वभूमीवर आता भारताने ' दहशवादाविरोधात आता शून्य सहिष्णुता '' धोरण अवलंबिले
(ATS arrests Ravindra Verma) महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील नौदलाच्या प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली रविंद्र वर्मा (Ravindra Verma) याला अटक करण्यात आली आहे.
(Pakistan Spy Qasim Arrested from Rajasthan) पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी करणाऱ्यांविरोधात शोधमोहिम सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आयएसआयसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अनेकांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने राजस्थानमधील भरतपूर येथून एका ३४ वर्षीय पाकिस्तानी गुप्तहेर मोहम्मद कासिम याला अटक केली आहे.
काश्मीरच्या अखनूर भागामध्ये बीएसएफच्या सात महिला जवानांनी दोन चौक्या संरक्षित ठेवल्या. सहाय्यक कमांडन्ट नेहा भंडारी यांच्या पराक्रमामुळे बीएसएफला हे यश आले. बीएसएफतर्फे या सात जणींच्या पथकाला माघार घेण्याचा पर्यायही देण्यात आला. मात्र, या रणरागिणी हटल्या नाहीत. केवळ वर्षांचा अनुभव गाठीशी असताना त्यांनीही कामगिरी बजावली.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पकिस्तानच्या फाळणीचा विषय पुन्हा चर्चेत आला. नजीकच्या भविष्यात पाकिस्तानची फाळणी होईल का? याबद्दल जाणून घेताना, आपण गेल्या दोन लेखांमध्ये बलुचिस्तान आणि सिंध प्रांताबद्दल माहिती घेतली होती. आता बघूया वायव्य सरहद्द प्रांताकडे...
भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एकाच दिवसाच्या अंतराने स्वतंत्र झाले. मात्र, एकाने दहशतवाद्यांना आंदण दिले आणि दुसरा देश हा कायम दहशतवादविरोधी भूमिका घेऊन विकासाची कास धरत प्रगतिपथावर राहिला. मात्र, पाकिस्तान आजही गरिबी, उपासमार आणि पोसलेल्या दहशतवादाच्या दाहकतेने ग्रस्त आहे.
(Shashi Tharoor warns Pakistan) 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,"असे थरूर यांनी पनामा
सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर पाकिस्तानचा बुरखा फाडत आहेत, त्याचवेळी काँग्रेस पक्षाने थरूर यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे.
पाकिस्तानच्या भारताविरोधात कुरापती पुन्हा एकदा जगापुढे उघड झाल्या आहेत. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशाने आता भारतीयांच्या जीवाशी खेळण्याचा आणखी एक काळा कारनामा केल्याचे उघड झाले आहे. एका भारतीय विमानाला आपत्कालीन लँडींग करण्यासाठी हवाई मार्ग वापरण्यास स्पष्ट नकार देण्यात आला.
पाकिस्तानी मोहजीर समुदायावर होणाऱ्या अन्यायाविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी करण्यात आली आहे. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटचे नेते अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान मोदींनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “पाकिस्तानमध्ये मोहाजिर समुदायावर अन्याय होत आहे. हा विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा करावी,” अशी विनंती त्यांनी मोदींना केली आहे. अल्ताफ हुसेन लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांनी व्हिडिओद्वारे ही मागणी केली आहे. ते म्हणाले, “पाकिस्तानमध्ये आमच्यासोबत क्रूरता केली जाते. मोहाजीर समाजाचे आयुष्य धोक्यात
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक उत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. ते कमालीचे यशस्वीही ठरले. मात्र, या कारवाईने बावचळून गेलेल्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची जी चूक केली, त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. पुरावे मागणार्या देशाबाहेरील तसेच, देशांतर्गत देशविरोधी शक्तींसाठी सरकारने ते तयार ठेवले आहेत.
विशेष प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गांधीनगरमधील महात्मा मंदिर येथे ५ हजार ५०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी एका विशाल जाहीर सभेला संबोधित करताना ‘ऑपरेशन सिंदूर’ कॅमेऱ्यासह करून त्याविषयी कोणासही पुरावे मागण्याची जागा ठेवली नसल्याचा टोला विरोधी पक्षांना लगावला.
पाकने आजवर नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांचा वापर काश्मीरप्रश्न मांडण्यासाठी केला. याच व्यासपीठावरून भारताने आता पाकला खडे बोल सुनावले आहेत. भारताची शिष्टमंडळे जगभरात पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा जगभर फाडत आहेत. भारताने आजवर संयम दाखवला, आता तो संयमाचा बांध अखेर फुटला आहे.
'ऑपरेशन सिंदूर' ही केवळ लष्करी कारवाई नाही, तर ती आपल्या भारतीयांच्या मूल्यांची आणि भावनांची अभिव्यक्ती आहे. याद्वारे भारताने पाकिस्तानला धडा शिकवून प्रमुख दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातमधील दाहोद येथे केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी वडोदरा येथे भव्य रोड शोमध्ये सहभागी झाले. यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचे कुटुंबियदेखील सहभागी झाले होते.
पाकिस्तानवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या आणि त्यांना संरक्षण देणार्यांच्या नांग्या ठेचल्या. मात्र, पाकिस्तान कितीही बेटकुळ्या फुगवून दाखवत असला, तरीही त्याची खरी शक्ती ही चीनचा पाठींबा हीच.परिणामी पाकिस्तानचा बंदोबस्त करण्यासाठी, चीन नावाच्या रोगाचा उपचार आवश्यक ठरतो. चीनी पोपटाचा जीव व्यापारात अडकल्याने, त्यावरच घाव घालणे क्रमप्राप्त ठरते. पाकिस्तानसहित तुर्कस्तान आणि चीनला नामोहरम करण्यासाठी अर्थिक बहिष्कार कसा उपयोगी ठरेल याचा घेतलेला आढावा...
(Pakistani High Commission official Danish was an ISI agent) ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारताने देशाअंतर्गत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या घरभेद्यांचा शोध सुरु केला. यामध्ये गेल्या आठवड्यात, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह वेगवेगळ्या राज्यांमधून अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे सगळे पाकिस्तानी उच्चायुक्तालयात अधिकारी असणाऱ्या आणि आयएसआय एजंट एहसान उर रहीम उर्फ दानिश आणि मुझम्मिल हुसेन उर्फ सॅम हाश्मी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या आरोपींना अटक केल्यानंतर, आयएसआय एजंट दानिश आणि मुझम्
सिंधू जल करारावरील पाकिस्तानच्या अपप्रचाराला सणसणीत उत्तर देताना भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानने भारतावर तीन युद्धे लादून आणि हजारो दहशतवादी घटना घडवून सिंधू जल कराराच्या भावनेचे उल्लंघन केले आहे.
पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला हल्ला म्हणजे केवळ एक दहशतवादी कारवाई नव्हे, तर भारताच्या सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाला दिलेला गंभीर इशारा आहे. पाकिस्तान जरी या हल्ल्याचा थेट सूत्रधार असला, तरी त्याच्या पाठीमागे उभा असलेला चीन हा अधिक धोकादायक आणि गुंतागुंतीचा भाग आहे. या त्रिकोणातील परस्परसंबंध आणि भारतासाठी उभ्या होत असलेल्या धोरणात्मक आव्हानांचा घेतलेला परामर्श
(Pakistan Army official threatens India in Hafiz Saeed's words) पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतीय सैन्याने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत कारवाई केली. मात्र, अजूनही पाकिस्तान सुधारण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. आता तेथील पाकिस्तानी लष्करानेही दहशतवाद्यांची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे. 'जर तुम्ही आमचे पाणी अडवले तर आम्ही तुमचा श्वास रोखू' अशी पोकळ धमकी पाकिस्तानकडून देण्यात आली आहे.
(India To Urge FATF To 'Grey List' Pakistan Again) पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारत आणखी मोठं पाऊल उचलणार असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानला पुन्हा एकदा 'फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स' (FATF) च्या ग्रे लिस्टमध्ये आणण्यासाठी भारत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहारांवर परिणाम होऊन परकीय गुंतवणूक आणि भांडवलाचा प्रवाह कमी होण्याची शक्यता आहे.
विजय वडेट्टीवार यांचे पाकिस्तान कनेक्शन शोधून काढायला हवे, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारकडे केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवार, २१ मे रोजी एक वादग्रस्त विधान करून ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या कामगिरीचा अवमान केला होता. यावर आता चित्रा वाघ यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले.
(PM Narendra Modi's stern warning to Pakistan) पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी २२ मे रोजी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. यावेळी बोलताना 'आता चर्चा जर चर्चा झालीच तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच होईल' असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच २२ एप्रिल रोजी झालेला भ्याड दहशतवादी हल्ला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'बाबतही त्यांनी भाष्य केले आहे.
विशेष प्रतिनिधी पहलगाममध्ये दहशतवाद्य़ांनी धर्म विचारून निष्पापांचे बळी घेतले. त्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानचा कणा मोडला आणि त्या चक्रव्युहात पाकला गुडघे टेकावे लागले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थानमधील बिकानेर येथे केले. राजस्थानमधील बिकानेर येथे 26,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करताना ते बोलत होते.
हा नवीन भारत आहे. तुम्ही आमच्यावर एक गोळी चालवलात तर तुमच्यावर बॉम्बचा वर्षाव केला जाईल, असा इशारा भाजप नेते प्रविण दरेकर यांनी पाकिस्तान आणि चीनला दिला आहे. ऑपरेशन सिंदूरमधील भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करण्यासाठी मागाठाणे विधानसभा क्षेत्रात तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
(Lashkar-e-Taiba co-founder Amir Hamza) दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सह-संस्थापक दहशतवादी आमिर हमजावर लाहोरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. या हल्ल्यात हमजा गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याला उपचारांसाठी पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवून १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अशातच आता अज्ञातांच्या हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी आमिर हमजा जखमी झाल्याची बातमी समोर आ
( Jyoti Malhotra ) पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रा ही सध्या भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. अटकेनंतर तपासादरम्यान ज्योतीविषयी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता तिची एक डायरी तपासयंत्रणांच्या हाती लागली आहे. या डायरीची काही पानं माध्यमांमधून समोर आली आहेत. पाकिस्तानात फिरुन आल्यानंतर तिनं आपला अनुभव या डायरीत लिहून ठेवला होता. ही पानं वाचल्यानंतर ज्योती पाकिस्तानच्या प्रेमात असल्याचं वेगळं सांगण्याची गरज नाही.
(Suicide Car Bomb hits school bus in Pakistan) पाकिस्तानच्या नैऋत्येला असणाऱ्या बलुचिस्तान प्रांतातील खुजदार जिल्ह्यात बुधवारी २१ मे रोजी शाळेच्या बसवर आत्मघातकी कार बॉम्बरकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल ३८ जण जखमी झाले, असे असोसिएटेड प्रेसने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
ऑपरेशन सिंदूरबद्दल जगातील प्रमुख देशांना माहिती देण्यासाठी आणि पाकिस्तानचा दहशतवादासोबतचा संबंध उघड करण्यासाठी भारताचा ‘ग्लोबल आउटरिच प्रोग्राम’ बुधवारपासून सुरू झाला आहे. सात प्रतिनिधी मंडळांपैकी दोन प्रतिनिधी मंडळांना आपल्या प्रवासास प्रारंभ केला आहे.
नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगातील एका कर्मचाऱ्याच्या नियमित संपर्कात असल्याची कबुली युट्यूबर ज्योती मल्होत्राने दिली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने कौतूकास्पद कामगिरी केल्याने देशभरात त्यांचा गौरव होत असताना काँग्रेसकडून मात्र, वारंवार त्यांचा अवमान करण्यात येत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवार, २१ मे रोजी असेच एक वादग्रस्त विधान केले आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा ही सध्या पोलिस कोठडीत असून चौकशीदरम्यान तिच्याबद्दल रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान, ज्योतीने लॅपटॉप आणि मोबाईलमधून डिलीट केलेले व्हिडीओ आणि डेटा जप्त करण्यात यश आले असून यात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.
(Four Children Killed in Pakistani Drone Strike in North Waziristan) पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तानमधील मीर अली गावात सोमवारी २० मे रोजी सकाळी सुमारे ६:३० वाजता झालेल्या पाकिस्तानी लष्कराच्या ड्रोन हल्ल्यात चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाला, तर दोन महिन्यांच्या बाळासह अनेक महिला गंभीर जखमी झाल्या. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात होऊ घातलेले युद्ध अर्ध्यावरती थांबले असले, तरी त्याची पूर्ण कहाणी समोर यायला काही दिवस लागले. वरकरणी हे युद्ध अनिर्णित अवस्थेत संपले असे वाटले, तरी या युद्धातील अनेक आघाड्यांवर भारताला निर्विवाद विजय मिळाला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ मधील घडामोडींचा घेतलेला आढावा...