ज्या निष्पक्षपणे चंद्रचूडांनी रामजन्मभूमी खटल्यात न्याय्य भूमिका घेतली, त्याच परखडपणे त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या ढोंगाबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे. आस्तिक-नास्तिक या वादात त्यांनी घेतलेल्या पवित्र्याचे कौतुक करायला हवे.
Read More
राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेवर बीबीसीने केलेल्या नकारात्मक कव्हरेजचा निषेध करण्यात येत आहे. बीबीसी ही युनायटेड किंगडमची सरकारी मीडिया संस्था असून आता त्यांच्याच देशात बीबीसीचा विरोध करण्यात येत आहे. २२ जानेवारी रोजी झालेल्या रामलला प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्याचे बीबीसीने केलेले कव्हरेज हे पक्षपाती, भेदभावपूर्ण आणि प्रक्षोभक असल्याचे ब्रिटनच्या एका खासदाराने म्हटले आहे.
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेचे एबीसी, बीबीसी, सीएनएन आणि अल जझीरासह अन्य प्रसारमाध्यमांनी एकांगी वार्तांकन केले आहे. त्यामुळे त्यांनी हिंदूंची माफी मागावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद, अमेरिकेने केली आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान’ उतरवण्याचा ऐतिहासिक पराक्रम भारताने केला आणि संपूर्ण जगाने त्याचे कौतुक केले. अवकाशातील महासत्तांमध्ये भारताचा झालेला समावेश साहेबांच्या इंग्लंडला पचनी पडलेला नाही, म्हणूनच त्यांची पोटदुखी सुरू झाली आहे. ‘बीबीसी’ने त्याबाबत केलेले वार्तांकन हे त्याचेच लक्षण!
बीबीसी प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले आहे. प्राप्तिकर विभागाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये बीबीसीवर एक कर सर्वेक्षण केले होते. ज्यामध्ये 2016 पासून करचोरी आढळून आली होती. आधी नाकारणाऱ्या बीबीसीने आता 2016 पासून कमी कर भरल्याचे मान्य केले आहे. सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीबीसीने स्वीकारले आहे की त्यांनी देय असलेल्यापेक्षा कमी कर भरला आहे. आयकर विभागाच्या रडारवर आल्यानंतर आता बीबीसीने थकित कर भरण्यासाठी अर्ज केला आहे.
नवी दिल्ली : बीबीसी या ब्रिटीशमाध्यसुहाच्या 'इंडिया: द मोदी क्वेश्चन' या कथित माहितीपटाविरोधात गुजरातस्थित जस्टिस ऑन ट्रायल या एनजीओने दिल्ली उच्च न्यायालयात १० हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला असून न्यायालयाने बीबीसीला समन्स बजावले आहे.
ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांचा आलिशान राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या भव्यदिव्य सोहळ्याचा अंदाजे १०० दशलक्ष पाऊंडांचा खर्च आर्थिकदृष्ट्या गटांगळ्या खाणार्या ब्रिटनला करावा लागला. याविरोधात आणि ‘राजेशाही नकोच’ म्हणून ‘नॉट माय किंग’ अभियानही ब्रिटनमध्ये चर्चेचा विषय ठरले. त्यानिमित्ताने ब्रिटनचा माठ रिकामा असताना केलेला राजा चार्ल्सच्या राज्याभिषेकाचा थाट, राजेशाहीचा इतिहास आणि ब्रिटनचे राजकारण यांचा आढावा घेणारा या लेखाचा पहिला भाग.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थात बीबीसी)इंडियाविरुद्ध विदेशी चलन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजेच फेमा अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी गुरुवारी, ६ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. केरळ काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे माजी संयोजक अनिल अँटोनी यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, व्ही मुरलीधरन, केरळ भाजप अध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. २००२ च्या गुजरात दंगली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसी डॉक्युमेंट्रीच्या वादानंतर अनिल अँटनी यांनी गेल्या जानेवारी महिन्यात काँग्रेस सोडली.
आपल्याच देशाची, पंतप्रधानांची, लोकशाहीची जागतिक स्तरावर केवळ राजकीय विद्वेषातून बदनामी करणे हा राहुल गांधींनी केलेला राष्ट्रद्रोहच! त्यामुळे मुखी ‘भारत जोडो’चा नारा आणि परदेशात ‘भारत तोडो’च्या अपप्रवृत्तींना थारा, असा हा राहुल गांधींचा ढोंगी दुटप्पीपणा भारताला ‘काँग्रेसमुक्त’ केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही!
”माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या १९८४च्या दंगलीवर माहितीपट का नाही,” असा थेट सवाल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी उपस्थित करत ‘बीबीसी’च्या वर्मावरच बोट ठेवले आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ‘बीबीसी’चा एकांगीपणा उघड केला.
सध्या जॉर्ज सोरोस हे अमेरिकन अब्जाधीश वादात सापडले आहे. सोरोस नरेंद्र मोदींचे विरोधक असून मोदींवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाही. नुकतेच त्यांनी केलेल्या वक्तव्याने पुन्हा नवा वाद उभा राहिला आहे. भारत हा लोकशाही देश आहे. परंतु, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकशाहीवादी नेते नाहीत. मुसलमानांविरोधात हिंसा भडकवण्याचे काम ते करत असून त्यामुळेच त्यांची प्रगती झाली. भारत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल, पेट्रोल खरेदी करतो आणि त्यातून मोठा नफा मिळवतो, असे सोरोस यांनी म्हटले आहे.
ब्रिटीश ब्रॉडकास्ट कॉर्पोरेशनने (बीबीसी) बनविलेल्या मोदीविरोधी माहितीपटामध्ये खोटी माहिती दाखविण्यात आली असून त्यामागे विशिष्ट प्रपोगंडा आहे, असा घरचा आहेर ब्रिटनच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी दिला आहे. बीबीसीने गुजरात दंगलप्रकरणी खोट्या माहितीवर आधारित बनविलेल्या माहितीपटावरून बीबीसीला जगभरातून टिकेचा सामना करावा लागत आहे. ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनीदेखील या माहितीपटाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे ब्रिटनमधील विविध क्षेत्रातील लोकांनीदेखील बीबीसीच्या माहितीपटा
खार वांद्रे भागात बीबीसी वर्ल्ड सर्विस ऑफिस येथे आयकर विभागाची धाड. तसेच, दिल्लीतील हिंदुस्थान टाइम्स या इमारतीमध्ये जे भारताचे मुख्य ऑफिस आहे तिथेही आयकर विभागाने धाड टाकली आहे.
आर्थिक अनियमतेप्रकरणी प्राप्तिकर खात्याने मंगळवारी बीबीसी या ब्रिटीश माध्यमसमुहाच्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयांमध्ये ‘सर्वेक्षण’ केले. यावर भाजपने आणि काँग्रेसने परस्परांवर टिका केली आहे.
माध्यमांच्या वाढत्या स्पर्धेत सतत अग्रेसर राहण्याच्या प्रयत्नात बीबीसी या वृत्तसंस्थेकडून वारंवार आगळीक केली जात आहे. देशांतर्गत तसेच परदेशातही बीबीसीची झपाट्याने घसरत असल्याने त्यावर उपाययोजना करण्याऐवजी बीबीसीने वादग्रस्त विषयांना मुद्दामच हाती घेतले आहे. त्यामुळे बीबीसीला तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे.
गुजरात दंगलप्रकरणी बीबीसीच्या खोट्या माहितीवर आधारित माहितीपटावर बंदी घालण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला तीन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
गुजरात दंगलविषयक बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्याच्या केंद्रा सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल जनहित याचिकेवर ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्याचवेळी हा प्रकार म्हणजे न्यायालयाचा मौल्यलान वेळ वाया घालविण्याचा प्रकार असल्याचा टोला केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी लगाविला आहे.
गुजरात दंगलविषयक बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याबद्दल केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार एन. राम, वकील प्रशांत भुषण आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी बीबीसी माहितीपटाविषयी दाखल याचिकेवर टोला लगाविला आहे. ते म्हणाले, एकीकडे सर्वसामान्य नागरिक न्यायासाठी तारखांची वाट पाहत असतात आणि त्याचवेळी दुसरीकडे अशा याचिकांद्वारे न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया घालविला जातो, असे रिजिजू म्हणाले आहेत.
बीबीसी या ब्रिटीश माध्यमसमुहाचा भारतविरोधी माहितीपट प्रदर्शित करण्याच्या नावाखाली देशातील विविध शिक्षण संस्थांमध्ये अस्तित्वात असलेल्या भारतविरोधी टूलकिटने पुन्हा एकदा उचल खाल्ली असल्याचे स्पष्ट झाले आहे. बीबीसी या ब्रिटीश माध्यमसमुहाचा भारतविरोधी माहितीपट प्रदर्शित करण्याच्या नावाखाली देशातील विविध शिक्षण संस्थांमध्ये अस्तित्वात असलेल्या भारतविरोधी टूलकिटने पुन्हा एकदा उचल खाल्ली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुण्यातील 'रेस्क्यू' या वन्यजीव बचाव संस्थेने जून महिन्यात वेळेत बिबट्यावर उपचार करत एका पाच महिन्याच्या मादी बिबट्याचे प्राण वाचवले. एका निरोगी बिबट्याकडून रक्त संक्रमण करून या अशक्त पिल्लाला देण्यात आले. उपचारानंतर हे पिल्लू स्थिरावले. आणि आता या पिल्लाची प्रकृती पूर्ण ठणठणीत आहे. सध्या हे पिल्लू 'रेस्क्यू'च्या पुण्यातील सेंटर ठेवण्यात आले आहे.
'युद्ध सुरु झालं तेव्हा...'
डॉ. मिलींद संपगावकर म्हणजे एक अफलातून व्यक्तीमत्त्व. यशस्वी उद्योजक आणि तितकेच समाजशील समाजहितचिंतक. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा घेतलेला मागोवा...
‘टीम मार्शल’ म्हणतोय, आजचं जग ‘युरो-अटलांटिक’ नव्हे, तर ‘इंडो-पॅसिफिक’ बनलंय. कारण, नवा जागतिक संघर्ष प्रदेश आता आशिया खंड आणि त्याच्या भोवतीचा हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर असणार आहे. या संघर्षातले मुख्य भिडू आहेत अमेरिका, चीन आणि उत्तर कोरिया. बाकीचे भिडू आहेत रशिया, जपान, तैवान, ऑस्ट्रेलिया, भारत आणि आखाती देश. म्हणजेच ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, हॉलंड हे युरोपिय प्रगत देश यात नाहीत. प्रगत आणि अण्वस्त्रसज्ज असूनही नाहीत. का नाहीत?
आयुषमान भारत - पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत कर्करोगावरील उपचारासंदर्भात संपूर्ण देशात गुहावटीतील डॉ. बी. बोरूह कर्करोग संस्था (बीबीसीआय) या संस्थेचा तिसरा क्रमांक आला आहे. आसाममध्ये आरोग्य मंथन २.० या संकल्पना लागू केल्यानंतरं दोन वर्षे झाली आहेत. बीबीसीआय ही योजना राबवणारी अग्रगण्य संस्था मानली जाते.
'प्रसार भारती'मधील पत्रकारांची भूमिका
दिल्ली हिंसाचाराचे एकांगी वार्तांकन केल्याचा आरोप
'अल-जझिरा' आणि 'बीबीसी'सारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मात्र काश्मीरच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता, आगीत तेल ओतण्याचे काम केले. कारण, काश्मीर खोऱ्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असताना या माध्यमांनी मात्र 'फेक न्यूज' प्रसारित करून परिस्थिती चिघळायलाच हातभार लावला.
भारतीयांना आपली संस्कृती, इतिहास, भाषा या सगळ्याचा जेवढा अभिमान आहे, तेवढाच अभिमान भारतीय सिनेमाचाही... दादासाहेब फाळकेंनी सुरू केलेली ही ‘सिनेमा’ नामक प्रथा आजही तेवढ्याच जोमात सुरू आहे. पण, मागे वळून पाहिल्यास आपल्या सहज ध्यानात येते की, सिनेमाची परिभाषा बदलली आहे.
ब्रिटीश अॅकॅडमी ऑफ फिल्म आणि टेलीव्हिजन आर्ट अर्थात बाफ्टाकडून नुकतीच बाफ्टा पुरस्कार आणि त्यातील नामांकनाची यादी जाहीर करण्यात आली आहे.