बीबीसी इंडियावर ईडीने दाखल केला गुन्हा

परकीय चलन नियमांच्या उल्लंघनाचा आरोप

    13-Apr-2023
Total Views | 53
Case against BBC

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थात बीबीसी)इंडियाविरुद्ध विदेशी चलन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. हा गुन्हा परकीय चलन व्यवस्थापन कायदा म्हणजेच फेमा अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.

या वर्षी फेब्रुवारी २०२३ मध्ये आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतील बीबीसी कार्यालयावर छापा टाकला आणि त्यासंबंधीच्या कागदपत्रांचीही तपासणी केली होती. या प्रकरणी अधिकृत निवेदन देताना, आयकर विभागाने म्हटले होते की ते एफडीआय उल्लंघनाच्या प्रकरणात बीबीसीची चौकशी करतील. त्यासाठी बीबीसीवर परकीय चलन उल्लंघन कायद्यांतर्गत (फेमा फंडिंग अनियमितता) गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, बीबीसीतर्फे काही दिवसांपूर्वी एक भारतविरोधी माहितीपट प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामध्ये गुजरात दंगलप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करण्यात आले होते. महत्वाचे म्हणजे या माहितीपटामध्ये खोट्या माहितीचा आधार घेऊन आरोप करण्यात आले होते. या माहितीपटाविषयी भारताने तीव्र आक्षेप नोंदवून ब्रिटनला इशाराही दिला होता. त्याचप्रमाणे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीदेखील या माहितीपटाविषयी हात झकटले होते.


 
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121