बीबीसी माहितीपटाबद्दल आता सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय!

पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

    30-Jan-2023
Total Views | 100
bbc documentary india the modi question case in high court


नवी दिल्ली : गुजरात दंगलविषयक बीबीसीच्या माहितीपटावर बंदी घालण्याच्या केंद्रा सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल जनहित याचिकेवर ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्याचवेळी हा प्रकार म्हणजे न्यायालयाचा मौल्यलान वेळ वाया घालविण्याचा प्रकार असल्याचा टोला केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी लगाविला आहे.

30 January, 2023 | 18:22
वकील एम. एल. शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात बीबीसी माहितीपटावरील बंदीविरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती करण्यात आली. यावेळी सरन्यायाधीशी याप्रकरणी पुढील आठवड्यात ६ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेणार असल्याचे सांगितले आहे.

बीबीसीच्या "इंडिया: द मोदी क्वेश्चन" या माहितीपटावर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय चुकीचा, मनमानीपणाचा आणि घटनाबाह्य असल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पत्रकार एन. राम आणि वकील प्रशांत भूषण यांनी बीबीसी माहितीपटाच्या लिंकसह केलेले ट्विट "आपत्कालीन अधिकार" वापरून हटविण्यात आल्याचे आणि अजमेरमधील विद्यार्थ्यांना माहितीपट दाखविल्याबद्द्ल निलंबित केल्याचाही मुद्दा वरिष्ठ वकील सी. यू. सिंह यांनी न्यायालयासमोर मांडला आहे.



अग्रलेख
जरुर वाचा
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी उभारणीला वेग ५ विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी उभारणीला वेग ५ विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

'मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी' या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी अधिकृत इरादापत्रेप्रदान केली जाणार आहेत. यामध्ये अ‍ॅबर्डीन विद्यापीठ, यॉर्क विद्यापीठ, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ, इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन या विद्यापीठांचा समावेश आहे. हे इरादापत्र प्रदान समारंभ आज शनिवार, दि. १४ जून रोजी ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित ..

उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

उल्हासनगरात कचरा उचलणाऱ्या कामगारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा

उल्हासनगर शहरातील कचरा उचलणाऱ्या कोणार्क कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक महिना होऊनही अद्याप पर्यंत पगार न दिल्याने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे . शुक्रवारी या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढा कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी जोपर्यंत कामगारांना पगार देत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतल्याने शुक्रवारी कामगारांनी काम बंद आंदोलन केले. कामगारांनी सुरू केलेल्या या आंदोलनामुळे शहरात कचऱ्याचे ढीग साचलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121