महाराष्ट्र सरकारने राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच देशभक्ती, शिस्त, व्यायामाची सवय आणि संघटितपणाची भावना रुजविणे हा आहे.
Read More
मुंबईत सुरु असलेल्या गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासासंदर्भात आज भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत सह्याद्री अतिथीगृह येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीमुळे गृहनिर्माण स्वयंपुनर्विकासाकरिता अर्थ पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे.
( Sahakar Bharati Women Self-Help Group Festival ) दि. १० आणि ११ मे २०२५ रोजी, पुणे शहराच्या हृदयस्थानी असलेल्या स्वारगेट येथील "गणेश कला क्रीडा मंच" या प्रतिष्ठित ठिकाणी एक आगळा-वेगळा, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक उपक्रम पार पडला – सहकारभारती महिला बचतगट महोत्सव. हा महोत्सव केवळ उत्पादनांची विक्री किंवा प्रदर्शन नव्हे, तर हा एक सामाजिक परिवर्तनाचा, महिला सक्षमीकरणाचा आणि सहकार तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव होता.
first meeting of the Self Redevelopment Study Group will be held on May 2nd
( Government decision issued to promote self-redevelopment ) राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली 11 जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. गुरुवार, दि. 24 एप्रिल रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना देण्यासाठी भाजपचे विधानपरिषदेतील गटनेते आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ११ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. गुरुवार, दि. २४ एप्रिल रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
मुंबई महानगरपालिका आणि केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत स्थापन 'नारी शहर समूह-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' आणि 'टीव्हीएस' यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील ५० महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रवासी रिक्षा वाटप करण्यात आल्या. आमदार मंगेश कुडाळकर, दिव्याज फाऊंडेशनच्या अध्यक्षा अमृता फडणवीस, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ.प्राची जांभेकर आदींसह महिला बचत गटाच्या सदस्यांच्या उपस्थितीत या रिक्षांचे वाटप करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेकडून यासाठी महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रश
( Guidance camp on self-redevelopment of buildings by cooperative housing societies in Panvel ) पनवेल-सिडको सहकारी गृहनिर्माण संस्था संघ मर्यादित यांच्या विद्यमाने आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या सहकार्याने 'सहकारी गृहनिर्माण संस्थाचा इमारतींचा स्वयंपुनर्विकास' या विषयावर उद्या रविवार, २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता पनवेल शहरातील विरूपाक्ष हॉल, अशोक बाग (वडाळे तलाव पनवेल) समोर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्मांतरणविरोधी चळवळ ते गावासाठी एक निस्वार्थी समाजसेवक म्हणून काम करणार्या, डहाणूच्या सावजी बीज यांच्याविषयी...
हिंदू हिंदूशी जोडण्यासाठी ‘विश्व हिंदू परिषदे’च्या ‘मातृशक्ती आयामा’तर्फे मुंबईतील पवई, विक्रोळी येथे सेवा वस्तीतील महिलांसाठी शिलाई केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले. स्वयंरोजगारातून आता महिलाशक्ती एकवटली आहे. या हिंदूहितैषी उपक्रमाचा आढावा घेणारा हा लेख...
''स्वयंपूर्ण विकास नाही हा आत्मनिर्भर विकास आहे. आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आज आपण श्वेतांबरीचे उद्घाटन केलेले आहे. श्वेतांबरीचे उद्घाटन केल्यानंतर सावंत यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन बघितलं तेव्हा खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण विकासाची जादू काय असते हे त्या मला लक्षात आले. आज स्वयंपूर्ण विकासामुळे या मुंबईतल्या मराठी माणसाला आणि मध्यमवर्गीयांना एक आशेचा किरण तयार झाला की त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर आत्मनिर्भरता आली, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या
सत्तेसाठी नेत्यांना संघटनेचे पाठबळ आवश्यक असते. ज्या पक्षात कार्यकर्त्यांना महत्त्व दिले जाते आणि त्यांचा मान राखला जातो, त्या पक्षाचाच पाया जनतेत कायम राहतो. सर्वोच्च नेत्याचा जनमानसात पाया असेल, तर असा पक्ष व्यक्तिकेंद्रित असला, तरी चालतो. पण, या नेत्याला लोकांचा पाठिंबा नसेल, तर त्याचे अस्तित्त्व त्या नेत्याबरोबरच संपते. उबाठा सेनेची सध्याची गत ही जनतेत पाया असलेल्या नेत्यांचे खच्चीकरण करण्याच्या धोरणामुळेच झाली आहे.
रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त प्रकरणानंतर पुन्हा एकदा ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील निर्बंधांचा आणि स्वयंनियमनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. तसेच अश्लीलतेचे नेमके निकष कोणते? अशा प्रकारांना कायमस्वरूपी कायद्याच्या चौकटीतून कसा आळा घालता येईल? आणि समाज म्हणून आपली नेमकी जबाबदारी काय? यांसारख्या मुद्द्यांचा प्रकर्षाने ऊहापोह करणारा हा लेख...
मुंबईतील मूळ मराठी माणूस मुंबईतच राहावा यासाठी इमारतींच्या स्वयंपुनर्विकासाचे महत्व आणि राज्य सरकारची यातील भूमिका याविषयी स्वयंपुनर्विकासाचे जनक भाजप विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्याशी दैनिक 'मुंबई तरुण भारत'ने साधलेला संवाद
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ( Union Budget ) कृषी आणि ग्रामीण विकासाला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले असून स्वयंपूर्ण शेती, सिंचन सुधारणा, वित्तपुरवठा सुलभता आणि पायाभूत सुविधा विकास यांवर दिलेला भर उपयुक्त ठरेल. अर्थात, या योजनांची यशस्वी अंमलबजावणी झाली, तर भारतातील शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि किफायतशीर होईल, यात वाद नाही.
विजयादशमी २०२४ ते विजयादशमी २०२५ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे शताद्बी वर्ष. त्यानिमित्ताने डोंबिवलीतील ‘टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळा’ने २०२५ या वर्षाची दिनदर्शिका संघ विचारपीठ, संघ व संघ परिवार केंद्रस्थानी ( Personality Building ) ठेवून निर्माण केली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या सक्रिय सहभागातून संपन्न झालेल्या अशा या अभिनव उपक्रमाविषयी...
मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे ( Mumbai Bank ) स्वयंपुनर्विकासासाठी १६०० गृहनिर्माण संस्थांनी संपर्क साधला असून आतापर्यंत १४ प्रकल्पांना २१८ कोटी रुपये दिले आहेत. त्यापैकी ४ प्रकल्प पूर्ण होऊन त्यांना घराचा ताबा देखील देण्यात आला आहे. बँकेला आर्थिक मर्यादा असल्याने मुंबई बँकेला पतपुरवठा करावा, अशी विनंती दरेकर यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला केली आहे.
मुंबई : बांगलादेशी घुसखोर वांद्रे पश्चिमपर्यंत आले आहेत. ते वांद्रे पूर्वेकडे पोहोचायला वेळ लागणार नाही. त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी सुरू असलेली भोंदूगिरी थांबवा, असा सल्ला देत माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार ( Ashish Shelar ) यांनी ‘उबाठा’ गटावर हल्लाबोल केला.
समाजात अगदी पूर्वापार सद्प्रवृत्ती विरुद्ध दुष्प्रवृत्तींचा संघर्ष अविरत सुरुच आहे. कालपरत्वे जरी या संघर्षाचे स्वरुप बदलले असले तरी सज्जन, दुर्जनांची विविध रुपे आजही अगदी सहज दृष्टिक्षेपास पडतात. पराकोटीची स्वकेंद्रीत ( Self Centered ) वृत्ती आणि नकारात्मकतेने भारलेल्या काही व्यक्ती, आपलेच खरे करण्याच्या नादात सज्ञान व्यक्तींनाही मूर्खात काढतात. आपले अज्ञान उघडे पडू नये, म्हणून शब्दच्छल, लपवालपवीचाही ते सोयीस्कर आधार घेतात. अशा या ‘संज्ञानात्मक विसंगती’विषयी..
मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात, पिथमपूर येथे विषारी कचऱ्याची विल्हेवाट लावू नये यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करीत होते. अशातच यातील काही जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न करत स्वताच्या अंगावर तेल ओतून घेतले. एका क्षणात भडका उडाला आणि ३ आंदोलनकर्त्यांनी पेट घेतला. सुदैवाने या आंदोलनात कुठलीही जीवीतहानी झालेली नाही, भाजलेल्या आंदोलनकर्त्यांवर नजीकच्या रूगणालयात उपचार सुरू आहे.
महारेराशी संबंधित विनियामक बाबींबाबत मार्गदर्शन आणि मदत व्हावी यासाठी मुंबई महाप्रदेशाबाहेरील विकासकांसाठी स्वयंविनियमक संस्था स्थापन करण्याची अट किमान ५०० प्रकल्पांवरून किमान २०० करण्याचा निर्णय महारेराने नुकताच घेतला आहे. मुंबई महाप्रदेशाबाहेर मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेल्या गृहनिर्माण क्षेत्राची बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन महारेराने हा नियम बदल केला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी सोमवारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त ७१,००० हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. यावेळी महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
नवी दिल्ली : शस्त्रास्त्रांसाठी एकेकाळी परदेशांवर अवलंबून असलेला भारत आता शस्त्रास्त्रांच्या सर्वात मोठ्या निर्यातदारांपैकी एक असलेल्या फ्रान्सला ‘पिनाक रॉकेट प्रणाली’ ( Pinak ) विक्रित करणार आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचे किंवा संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’चे यश आहे. ‘पिनाक’ हे भारताच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने विकसित केले आहे. ‘पिनाक रॉकेट प्रणाली’ला भगवान शिवाच्या धनुष्याचे नाव देण्यात आले आहे.
‘भावनिक बुद्धिमत्ता’ हा शब्द बरेचदा आपण वाचतो, ऐकतोही. पण, त्याविषयी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला फारशी माहिती नसते. तेव्हा, आजच्या लेखातून ‘भावनिक बुद्धिमत्ते’च्या विश्वात डोकावून ही संकल्पना समजावून घेऊया.
टेटवली गावच्या नमिता भुरकुड, गीतांजली भुरकुड, अंजली फडवले, निकिता भुरकुड, अलका मेढा आणि जागृती फडवले या सहा महिला नुकत्याच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांचे अभिनंदन. त्याचबरोबर पाड्यातील वंचित आणि समाजप्रवाहापासून दूर असलेल्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणून त्यांच्या आयुष्याचे सोने करणार्या केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्पाच्या परिसस्पर्शाचेही मनोमन अभिनंदन. दहावी उत्तीर्ण होणार्या या भगिनींच्या यशाच्या पार्श्वभूमीचा या लेखात मागोवा घेतला आहे.
संरक्षण सामग्रीच्या खरेदीत जगात पहिल्या क्रमांकावर असलेला भारत आता या क्षेत्रातही आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. भारतीय लष्कराने पुढील वर्षापासून कोणत्याही प्रकारचा दारूगोळा आयात न करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५-२६ नंतर भारतीय लष्कर देशातर्गंत उत्पादकांकडूनच दारूगोळा खरेदी करेल.
मानवी मानसशास्त्राच्या गुंतागुंतीच्या परिघात, self discipline and honesty या दोन गुंफलेल्या संकल्पना वैयक्तिक विकासाचे आधारस्तंभ म्हणून उभ्या आहेत. एकत्रितपणे, ते एक गतिमान जोडी तयार करतात, जी जीवनातील आव्हाने पेलायची, आपल्या ध्येयांचा पाठपुरावा करण्याची आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याची आपली क्षमता दर्शवते.
ग्रामीण महिलांच्याउपस्थितीत पहिल्यांदाच आयोजित केलेला महिला सशक्तीकरण सोहळा रविवार, दि. १० मार्च रोजी वाडा तालुक्यातील गालथरे गावातील गोवर्धन ईकोव्हीलेज येथे यशस्वीरित्या पार पडला. या सोहळ्याचे शब्दचित्रण या लेखात केले आहे.
वैयक्तिक विकासाच्या क्षेत्रात, स्वयं-शिस्तीची संकल्पना सर्वोच्च ठरते. आपण आत्म-शिस्त या मानसशास्त्रातील अत्यंत गरजेच्या क्षेत्राबद्दल ऊहापोह करणार आहोत. त्या अनुषंगाने तुमचे विचार, भावना आणि वर्तन तुमच्या एकाग्र, वचनबद्ध आणि सदैव प्रेरित राहण्याच्या क्षमतेमध्ये कसे योगदान देतात, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचा अर्थसंकल्प दि. १ फेब्रुवारी रोजी सादर केला. देशाचा संरक्षण अर्थसंकल्प हा गेल्या वर्षी ५.९३ हजार कोटी होता. आता तो ६.२२ हजार कोटी इतका वाढला आहे. देशाच्या जीडीपीच्या मापदंडावर संरक्षण अर्थसंकल्प १.३९ टक्के आहे. २०२४-२५चा संरक्षण अर्थसंकल्प एकूण सरकारी खर्चाच्या १५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्याचे या लेखात केलेले सविस्तर विश्लेषण...
एकेकाळी हिंदूंना संघटित करणे, गुलामगिरीची मानसिकता संपवणे आणि ‘स्व’वर आधारित राष्ट्रीय चेतना जागृत करणे केवळ अशक्यप्राय वाटत होते. मात्र, रा. स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषदेने परिस्थिती प्रतिकूल असताना देखील तसे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ४० वर्षांपूर्वी सर्व संत समाज आणि अनेक संस्था आणि संघटनांना एकत्र आणले आणि रामजन्मभूमी चळवळ सुरू केली. एका ठिणगीची गरज होती आणि भगवान श्रीराम ही ती ठिणगी होती, जी हिंदू समाजाची ऊर्जा जागृत करण्यासाठी साहाय्यक ठरली.
भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या वेगाने जगाला थक्क केले आहे. तशातच २०३० पर्यंत भारत ही सात ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून नावारुपाला येईल, असा आशावाद अर्थमंत्रालयाने नुकताच व्यक्त केला. जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्था मंदीच्या संकटाचा सामना करत असताना, भारतवृद्धीचे हे ‘मोदीनॉमिक्स’ समजून घेणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते.
देशाची राजधानी दिल्ली येथे आज, बुधवार, दि. 17 जानेवारी रोजी हिंदवी स्वराज्य स्थापना महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने हिंदवी स्वराज्य स्थापना महोत्सव आयोजन समितीचे संयोजक वैभव डांगे यांचा हा विशेष लेख...
‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ योजनेतील ओडिशाचे जोडीदार राज्य असणार्या महाराष्ट्रातील सात सदस्यीय माध्यम प्रतिनिधींनी दि. ८ ते ११ जानेवारीदरम्यान आयोजित अभ्यास दौर्याअंतर्गत ओडिशातील विविध आरोग्य, कृषी, औद्योगिक आणि तांत्रिक संशोधन संस्था, पर्यटन स्थळे आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी दिल्या. यासह ओडिशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील ‘विकसित भारत संकल्प अभियान व्हॅन’ला मिळणारा प्रतिसाददेखील अनुभवला. यादरम्यान केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तेव्हा ‘ओडिशायन’ या
लोकनेते दि. बा. पाटिल यांच्या जयंतीदिनी म्हणजेच येत्या १३ जानेवारी २०२४ रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात सकाळी ९ वाजेपासून दुपारी ४ वाजेपर्यंत महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या महारोजगार मेळाव्याचे आयोजक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी दिली आहे.
हुरुन इंडियाच्या टॉप-२०० सेल्फ-मेड उद्योजकांच्या यादीत डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी पटकावला आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक हुरुन इंडिया लिस्ट ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली.
जगातील सर्वांत प्रभावी क्षेपणास्त्ररोधी यंत्रणांचा विषय येतो, त्यावेळी अमेरिका, रशिया आणि इस्रायलचे नाव पुढे येते. मात्र, विशेष म्हणजे जगातील सर्वांत कार्यक्षम आणि धोकादायक समजल्या जाणार्या क्षेपणास्त्ररोधी यंत्रणांपेक्षा भारताची ‘कुश’ ही यंत्रणा प्रभावी असणार आहे.
महिलांना कौशल्य-विकास आणि उद्योजकतेच्या संधी प्रदान करण्यासाठी काम करणारा स्किलटेक प्लॅटफॉर्म हुनर ऑनलाईन कोर्सेसने भारतात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे.मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या एका कार्यक्रमात हुनर ऑनलाईन कोर्सेसने गुंतवणूकदार शिल्पा शेट्टी कुंद्रा यांच्यासह २८ राज्यांमध्ये ५५००० पेक्षा जास्त महिला उद्योजिकांना तयार करण्याच्या आपल्या वाटचालीचा तसेच भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोण्याच्या यशाचा आनंद साजरा केला.
समर्थ सांगत आहेत की, तुमच्या हितासाठी जे सत्य आहे, ते मी तुम्हाला सांगत आहे. तुमच्या हितासाठी तुम्हाला याचा शोध घ्यायचा आहे. आत्मप्रचिती घ्यायची आहे. माझे सांगणे जसेच्या तसे न स्वीकारता खरे हित शोधण्याचा तुम्हीच प्रयत्न करा. आत्मप्रचितीने खर्या हिताची जाणीव होते.
देशातील तरुणांनी स्वत:मधील कौशल्य विकसित करावे. तसेच स्वयंरोजगार करताना अन्य तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी येथे केले.
आमदार अपात्रता तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अनुक्रमे ९ ऑक्टोबर आणि २८ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
राष्ट्रसुरक्षेइतकीच महत्त्वाची असते ते नागरी सुरक्षा. जमाव आक्रमक होणे, हिंसक दंगली यांसारखे प्रसंग हे अनपेक्षितच. पण, अशावेळी आपल्या कुटुंबीयांच्या, समाजाच्या तसेच स्वसुरक्षेसाठीही तत्पर असणे तितकेच महत्त्वाचे. तेव्हा, असे प्रसंग उद्भवू नये, ही विघ्नहर्त्याकडे प्रार्थना करुयाच. पण, त्याचबरोबर यदाकदाचित असा बिकट प्रसंग उद्भवलाच, तर नागरिकांनी नेमके काय करावे, यासंबंधीचे मार्गदर्शन करणारा हा लेख...
`फ्रेंड्स ऑफ बीजेपी'तर्फे ठाण्यात गणेशोत्सवात `सेल्फी विथ बाप्पा' स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व `फ्रेंड्स ऑफ बीजेपी'चे शहर संयोजक दत्ता घाडगे यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून झालेली स्पर्धा ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहील.
गेल्या अनेक वर्षांपासून सर्वण समाजातील आर्थिक दुर्बल किंवा होतकरू तरूणांचा हाताला काम मिळावे यासाठी सरकारी योजना महामंडळ अथवा निधी सहाय्य मिळावे अशी मागणी समाजातून होती. अर्थात त्यातून किती मतदान राजकीय पक्षांना मिळेल हा वेगळा मुद्दा आहे. परंतु राष्ट्रावर प्रेम असलेल्या राष्ट्रवादी विचारांची मोट बांधलेल्या समविचारी लोकांनी एकत्र येत ' अमृत' योजना राबवायला सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे समाजातल्या शेवटच्या घटकांना सक्षम बनविण्यासाठी या महाराष्ट्र शासन पुरस्कृत अमृत योजना ही स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी निर
अंतराळ मोहिमा आणि आत्मनिर्भर भारत (आत्मनिर्भर भारत) उपक्रम यांच्यातील समन्वय भविष्याला आकार देत आहे जिथे अंतराळ तंत्रज्ञान आणि संशोधनात स्वयंपूर्णता ही केवळ एक शक्यता नाही तर एक धोरणात्मक अत्यावश्यक आहे. आजच्या भागात आपण सरकारी समर्थन, योजना आणि स्वदेशी कंपन्यांना चालना देण्यासाठी, संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आणि अंतराळ क्षेत्रातील नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जाणून घेऊ. तसेच एमएसएमई, रोबोटिक्स, चिप्स आणि सेन्सर उत्पादन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये हे उपक
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारताची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. सन २०४७ पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केले आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी व देशाला महासत्ता बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान असावे, यासाठी ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार अहोरात्र काम करीत आहे.
एकविसावे शतक हे भारताचे असून संपूर्ण जग आपल्याकडे विश्वमित्र या भावनेने पाहत आहे. देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी घराणेशाही, भ्रष्टाचार आणि लांगुलचालनाविरोधात लढा देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७६ व्या स्वातंत्र्यदिनी देशास संबोधित करताना केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दि. १२ ऑगस्ट रोजी लखनऊमध्ये अमली पदार्थमुक्त राज्य-सशक्त राज्य अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी युवकांना आवाहन केले आहे की, नशेमुळे सर्वनाश होतो. त्यापासून दूर राहा.आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त त्यांनी तरुणांना शुभेच्छाही दिल्या. यानिमित्ताने त्यांनी ट्विट करून म्हटले की, 'आंतरराष्ट्रीय युवा दिना'निमित्त सर्व तरुण मित्रांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
लोकमान्य टिळकांना जनतेने ‘लोकमान्य’ ही पदवी दिली होती. त्यांचे नेतृत्व जनमान्य ठरले होते. तशाच प्रकारे जगभरात देशाची मान अभिमानाने उंचावणारे, ‘आत्मनिर्भर भारता’चा नारा देऊन जनतेच्या मनात आत्मविश्वासाची निर्मिती करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्यता लाभली आहे,” अशा शब्दांत ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’चे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांनी पंतप्रधान मोदींचा गौरव केला होता.
रोजगार-स्वयंरोजगार या क्षेत्रांमध्ये काम करणार्या महिलांना परंपरागत स्वरुपाचा व कमी उत्पन्न देणार्या क्षेत्रांपासून अधिक आर्थिक उत्पन्न देणार्या कामकाजाकडे काम करण्यास प्रवृत्त करायला हवे. त्यांना असलेला अनुभव व त्यांनी आपापल्या क्षेत्रात प्राप्त केलेले कौशल्य अधिक उत्पादक व परिणामकारक स्वरुपात कसा उपयोग केला जाऊ शकेल, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायला हवी.