विद्यार्थी वसतीगृहात जेवत होते अन् अचानक विमान आत शिरलं! अहमदाबादमधील दुर्घटनेत काय घडलं?

    12-Jun-2025
Total Views | 129

गांधीनगर : अहमदाबाद येथे झालेल्या प्रवासी विमान अपघाताच्या घटनेनेने संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, हे विमान अहमदाबादमधील एका वसतीगृहावर कोसळले असून यात वसतीगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच या अपघातात वसतीगृहातील अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचीही प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

गुरुवारी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे AI-१७१ विमान कोसळून मोठा अपघात घडला. या विमानात एकूण २४२ प्रवासी असून अपघातातील मृतांचा आकडा अद्याप पुढे आलेला नाही. दरम्यान, या दुर्घटनेनंतर घटनास्थळी बचाकार्याला वेग आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर हे विमान कोसळले. दुपारी दीड वाजताच्या सुमारास विद्यार्थ्यांना जेवणाची सुट्टी झाली असून सगळे विद्यार्थी जेवत होते. याचवेळी अचानक हे विमान कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. यात २० हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच इथले अनेक डॉक्टर्स जखमी झाल्याचीही माहिती पुढे आली आहे.

एअर इंडियाचे हे विमान वसतीगृहावर कोसळल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यावरून हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येते. दरम्यान, बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावरदेखील बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121