SCO summit : पाकिस्तानला गोंजारणाऱ्या SCO परिषदेत भारताने सुनावले खडेबोल! केंद्रीय संरक्षण मंत्र्यांनी करुन दिली पहलगाम हल्ल्याची आठवण

    26-Jun-2025
Total Views | 13
 
 SCO summit
 
 
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख न केल्याने केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शांघाय सहकार्य संघटनेला चांगलेच फटकारले आहे. तसेच या संघटनेच्या निवेदनावर स्वाक्षरी करण्यासही नकार देण्यात आला आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेकरता भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सध्या चीन दौऱ्यावर आहेत. या परिषदेत संपूर्ण जगाला दहशतवासंदर्भात कडक इशारा देत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला फटकारले. शांघाय सहकार्य संघटनेच्या निवेदनात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख नव्हता यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.
 
पहलगाम हल्यानंतर प्रथमच, चीनच्या किंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत पहिल्यांदाच भारत आणि पाकचे संरक्षणमंत्री आमनेसामने आले होते. या परिषदेत भारत, रशिया, चीन, पाकसह इतर देशांचे दहा संरक्षण मंत्री एकाच मंचावर होते. शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण पाकिस्तानला करुन दिली. यावेळी पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांना राजनाथ सिंह यांनी चांगलेच फटकारले. ते म्हणाले, “निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. काही देश हे दहशतवादाला पोसतात. यापुढेही भारत अशांना जशास तसे उत्तर देईल.”
 
एससीओ परिषदेत सहभागी झालेल्या इतर देशांनाही दहशतवादाविरुद्ध एकत्रित येत लढण्याचे आवाहनसुद्धा यावेळी त्यांनी यांनी केले. राजनाथ सिंह म्हणाले की, "भारत दहशतवादाला पोसणाऱ्या देशांचा दुटप्पीपणा सहन करणारा देश नाही. जे देश हा दुटप्पीपणा करतात अशा देशांची शांघाय सहकार्य संघटनेने उघडपणे पोलखोल करावी आणि त्यांनी पोसलेल्या दहशतवादाविरुद्ध कठोरात कठोर भूमिका घ्यावी."
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121