राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वाचा आरोप करणारी जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली
05-May-2025
Total Views |
नवी दिल्ली, काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे भारत आणि युनायटेड किंग्डमचे दुहेरी नागरिकत्व असल्याचा आरोप करणारी जनहित याचिका (पीआयएल) अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने सोमवारी फेटाळली आहे.
कर्नाटकातील भाजप कार्यकर्ते एस विघ्नेश शिशिर यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की राहुल गांधी हे ब्रिटन तसेच भारताचे नागरिक आहेत, ज्यामुळे ते संविधानाच्या कलम ८४ (अ) अंतर्गत निवडणूक लढवण्यास अपात्र ठरतात.
सुनावणीदरम्यान, लखनौ खंडपीठाने केंद्र सरकारला या प्रकरणावर आतापर्यंत केलेल्या कारवाईचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले, त्यानंतर हा खटला रद्द करण्यात आला आहे.