‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे भारतीयत्वाची अभिव्यक्ती – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    26-May-2025
Total Views | 9

‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे भारतीयत्वाची अभिव्यक्ती – पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 'ऑपरेशन सिंदूर' ही केवळ लष्करी कारवाई नाही, तर ती आपल्या भारतीयांच्या मूल्यांची आणि भावनांची अभिव्यक्ती आहे. याद्वारे भारताने पाकिस्तानला धडा शिकवून प्रमुख दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातमधील दाहोद येथे केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी वडोदरा येथे भव्य रोड शोमध्ये सहभागी झाले. यावेळी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचे कुटुंबियदेखील सहभागी झाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाहोदमध्ये २४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्राला समर्पित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूर' ही केवळ लष्करी कारवाई नव्हती तर ती भारताच्या मूल्यांचे आणि भावनांचे प्रतिबिंब होती. दहशतवाद्यांना त्यांच्या दुष्कृत्यांची काहीच कल्पना नव्हती. १४० कोटी भारतीयांना दहशतवादाने आव्हान दिले होते. पंतप्रधान म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडून भारताच्या सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि त्यांनी दशकांमधील अभूतपूर्व अशी कारवाई केली. सीमेपलीकडे असलेले नऊ मोठे दहशतवाद्यांचे अड्डे २२ मिनिटांत नष्ट करण्यात आले. पाकिस्तानी सैन्याने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण भारतीय सैन्याने त्यांना पूर्णपणे हादरवून टाकले आणि नेस्तनाबुत केले, असे पंतप्रधानांनी म्हटले.

दाहोद, वडोदरा, गोधरा, कलोल आणि हलोल यांनी एकत्रितपणे गुजरातमध्ये एक उच्च-तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि उत्पादन कॉरिडॉर स्थापित केला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, वडोदरामध्ये भारतातील पहिले गति शक्ती विद्यापीठ देखील आहे. दाहोदमध्ये आता भारतातील सर्वात शक्तिशाली लोकोमोटिव्ह - ९,००० अश्वशक्तीचे इंजिन - तयार करण्याची सुविधा आहे, जी देशासाठी अभिमानाचा क्षण आहे.गोध्रा, कलोल आणि हलोल येथे उत्पादन युनिट्स, लघु उद्योग आणि एमएसएमईची लक्षणीय उपस्थिती आहे, जे गुजरातच्या औद्योगिक विकासात योगदान देत आहेत. गुजरातचा हा प्रदेश सायकली आणि मोटारसायकलींपासून ते रेल्वे इंजिन आणि विमानांपर्यंत सर्व गोष्टींच्या उत्पादनासाठी ओळखला जाईल अशा भविष्याची कल्पना करताना, पंतप्रधान म्हणाले की असा उच्च-तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि उत्पादन कॉरिडॉर जागतिक स्तरावर दुर्मिळ आहे, ज्यामुळे औद्योगिक महासत्ता म्हणून गुजरातचे स्थान मजबूत होते, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.








अग्रलेख
जरुर वाचा
पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत आज महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या चार जिल्ह्यांत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, विदीशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. मुंबईत आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याला मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121