एक असा ज्योतिषी ज्याच्याकडे आहे ८० हजार गुन्हेगारांची कुंडली!

    17-Jun-2025
Total Views | 17
 
up IPS Shravan Kumar Singh
 
लखनऊ : सर्वांनी ज्योतिषीजवळ आपली कुंडली केव्हा ना केव्हा तरी पाहिली असेलच. पण उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये एक आयपीएस अधिकारी असा आहे ज्याने गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. हे अधिकारी म्हणजे आयपीएस श्रवण कुमार सिंह. ज्यांच्याजवळ पश्चिम उत्तर प्रदेशापासून कानपूरपर्यंतच्या ८० हजार गुन्हेगारांची संपूर्ण कुंडलीच आहे. या ज्योतिषी आयपीएस अधिकाऱ्याला चांगलेच माहिती आहे की, उत्तर प्रदेशच्या कोणत्या जिल्ह्याच्या कोणत्या कोणत्या गावात कोण व कीती गुन्हेगार आहेत.
 
शंभर दोनशे नव्हे तर तब्बल ८०,००० गुन्हेगारांची कुंडली!
 
आयपीएस सिंह यांनी हायस्कूलनंतर आपले शिक्षण सोडले. या दरम्यान, ते एका अधिकाऱ्याला भेटले ही भेटच सिंह यांच्या आयुष्याचा उद्देश बदली. ते अभ्यास करू लागले आणि पीपीएस अधिकारी बनले, आणि गुन्हेगारीला मुळापासून नष्ट करण्याचे त्यांनी सुरू केले. आतापर्यंत ३२ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत आयपीएस सिंह यांनी २० गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा यात सिंग हे तज्ज्ञ आहेत. गुन्हेगारांचा डेटा ते नेहमीच आपल्यासोबत ठेवतात. त्यांच्याकडे ८० हजार गुन्हेगारांच्या कुंडल्या आहेत.
 
युपीतील गुन्हेगारांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात त्यांना दोनदा पोस्टिंग मिळाली आहे. सिंग यांची बदली जिथे होते तिथे ते नेहमीच गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जातात. १९९२ च्या बॅचचे पीपीएस अधिकारी श्रवण सिंग यांना २०१४ मध्ये आयपीएस पदावर बढती मिळाली. सिंग हे सध्या कानपूरमध्ये डीसीपी सेंट्रल म्हणून सेवा बजावत आहेत.
 
अश्या बनवल्या कुंडल्या
 
आयपीएस सिंग सांगतात की, "मी सेवेत रुजू झाल्यानंतर गुन्हेगारांची मानसिकता वाचायला लागलो, गुन्ह्याच्या ठिकाणी मी जाऊन पुरावे गोळा करायचो. यामध्ये, मी घटनास्थळी सहकाऱ्यांसोबत बैठका घ्यायचो. चौकशी आणि जबाब नोंदवल्यानंतर जे सत्य समोर यायचे त्याने प्रकरणे लवकरात लवकर सोडवण्यास मदत व्हायची."
 
या दरम्यान, "मी स्वतःची गुन्हेगारी डायरी लिहायचो आणि तीच माझी सवय झाली. १९९९ मध्ये, मी गाजीपूरमधील मोठ्या ड्रग्ज व्यवसायाचा अंत केला. याशिवाय, मी मेरठ, आग्रा, बनारस, मथुरा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील अन्य भागातील ८० हजारहून अधिक गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार केल्या आणि त्यांना मुळापासून नष्ट करण्याचे काम केले."
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याणमध्ये भाजपाचा पाणी टंचाईच्या विरोधात रास्ता रोको केडीएमसीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

कल्याण पूर्वेतील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत असल्याने त्याविरोधात भाजपाने मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसत मोर्चा काढला. भाजपाने महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयावर धडक दिली. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रभाग कार्यालयासमोरील कल्याण पूना लिंक रोडवर ठिय्या मांडून तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. महापालिकेच्या विरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर महापालिकेने पाणी टंचाई सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर भाजपाने रास्ता रोको आंदोलन ..

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

राज्य सहकारी संघ निवडणूकीत ‘सहकार पॅनेल’चे निर्विवाद वर्चस्व दरेकर-कुसाळकर-नलावडेंच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलचे २१ पैकी २० उमेदवार विजयी

१०६ वर्षांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या २०२५-२०३० पंचवार्षिक निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर, राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर आणि सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी २० जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवित मोठा विजय संपादित केला आहे. महाराष्ट्रातील सहकार चळवळ पुन्हा ताकदीने कशी पुढे येईल यासाठी दिशादर्शक मार्गदर्शन करणारा संघ ठरेल, असा विश्वास यावेळी भाजपा गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला...

भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला

भारतीय शौर्य पुन्हा एकदा उजेडात आणुया, चला 'विजय दिवस साजरा करूया!

आपल्या दैदीप्यमान पराक्रमी इतिहासाच्या जोरावर प्रखर राष्ट्रभक्तीने जगभरात भारतीय संस्कृतीची अटल छाप सोडणाऱ्या माझ्या भारतीय बांधवांना 'विजय दिवसाच्या' हार्दिक ' शुभेच्छा! २६ जुलै १९९९ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रद्धेय दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात कारगिल मध्ये पाकिस्तानला युद्धात पराजित करून 'भारतीय शुर सैनिकांनी ऑपरेशन विजय' यशस्वी केले. तब्बल १८ हजार फूट उंचीवर भारतीय सैन्याने आपले शौर्य जगाला दाखवले होते. एवढ्या उंचीवर आणि उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात लढले गेलेले हे युद्ध जगातील एकमेव ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121