"नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही"; हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद

    29-May-2025   
Total Views | 10

vipul dushing
 
पुणे : (Vaishnavi Hagwane Case Hearing) वैष्णवी हगवणेच्या मृत्यूला आता जवळपास दोन आठवडे पूर्ण होत आले. मात्र वैष्णवीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे प्रकरण सतत चर्चेत आहे. मात्र आता कोर्टात झालेल्या युक्तिवादामुळेच या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. कोर्टात झालेल्या युक्तिवादात हगवणेंच्या वकिलानं वैष्णवीच्या चारित्र्यावर गंभीर आरोप केले आहेत. वैष्णवीची एका व्यक्तीसोबत चॅटिंग पकडल्यानंतर ती आत्महत्येचा प्रयत्न करत होती, तसेच नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असा अजब युक्तिवाद केला. 
 
ही हुंडाबळीची केस नाही, आत्महत्येचे कारण वेगळेच
 
युक्तीवाद करताना हगवणे कुटुंबियांचे वकिल अॅड. विपुल दुशिंग (Advocate Vipul Dushing) यांनी खळबळजनक विधान केले. ते म्हणाले, "वैष्णवीची प्रवृत्तीच स्वतःला संपवण्याची होती. तिचे एका व्यक्तीसोबतचे नको ते चॅट एकदा पकडण्यात आल्याने तिने अनेकवेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन तर एकदा गाडीतून उडी मारुन तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. असा दावा केला. वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची, आम्ही ते पकडले आणि त्या व्यक्तीने त्रास दिला असेल म्हणून तिने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न असावा. मोबाईल चॅट व्हायरल झाल्यानं चॅट लपवल्याच्या दाव्यात काही अर्थ नाही. ही हुंडाबळीची केस नाही. तिने आत्महत्या करण्याचे कारण वेगळे आहे, परंतु पोलीस त्याचा शोध घेत नाहीयेत, असा दावा त्यांनी केला.
 
नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही
 
एखाद्या नवऱ्यानं आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे तो छळ होत नाही, असा युक्तीवादही त्यांनी केला. हगवणेंकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत, ४० लाखांच्या फॅार्च्युनरसाठी ते कशाला छळ करतील असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच त्यांनी याप्रकरणी फरार असलेला संशयित निलेश चव्हाणला या प्रकरणात अडकवण्यात आल्याचं म्हटलयं. ते म्हणाले, "निलेश चव्हाणला सहआरोपी करणं चुकीचं आहे, कारण पाचही जण अटकेत असताना त्यानेच बाळाला सांभाळले आहे, परंतु त्याने बाळाची हेळसांड केल्याचा आरोप करत त्याच्यावरच गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये त्याचा काय दोष? त्याच्यावर पूर्णपणे अन्याय झाला आहे. असा युक्तीवाद कोर्टात करण्यात आला.
 
वकिलांकडून युक्तीवाद करताना बचावाचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला असला तरी, हगवणेंना पोलीस कोठडीपासून वाचवण्यात त्यांना यश आलं नाही. दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना ३१ मे पर्यंत म्हणजे तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तर शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिष्मा हगवणे यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
 
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार ३७१ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121