संवेदनशील काळात जबाबदारीने वागा – सर्वोच्च न्यायालय

- पहलगाम हल्ल्याची न्यायिक चौकशीची याचिका फेटाळली

    01-May-2025
Total Views | 22
संवेदनशील काळात जबाबदारीने वागा – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, पहलगाम दहशतवादी हल्ल्याची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोग स्थापन करण्याचे निर्देश मागणाऱ्या जनहित याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला आणि याचिकाकर्त्याला फटकारले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत न्यायालयीन आयोग स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १ मे रोजी सुनावणी होणार झाली. काश्मीरमधील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरला निर्देश देण्याची विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. ही याचिका काश्मीरमधील रहिवासी मोहम्मद जुनैद यांनी फतेश कुमार साहू आणि विक्की कुमार यांच्यासह दाखल केली होती. हे प्रकरण न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर आले असता न्यायालयाने सुनावणीस नकार देऊन संवेदनशील काळात बेजबाबदार याचिका दाखल केल्याबद्दल न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले.

न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, "अशी जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी जबाबदारीने वागा. देशाप्रती तुमचे काही कर्तव्य आहे. या संवेदनशील काळात अशा प्रकारे सैन्याचे मनोबल खचवण्याचा प्रयत्न करत आहात, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना चौकशी करण्यास सांगत आहात. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या विषयाचे तज्ज्ञ कधीपासून झाले; असा सवाल न्या. सूर्यकांत यांनी विचारला.

व्यक्तिगतपणे हजर असलेल्या एका याचिकाकर्त्याच्या विनंतीवरून खंडपीठाने याचिका मागे घेण्याची परवानगी दिली.


अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121