विषारी सापांचे काय करायचे

    30-Apr-2025
Total Views | 14
 
Rahul Gandhi should really set up his mohabbat ki dukan in Pakistan now
 
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याबाबत राहुल गांधी म्हणाले, “भावाभावांना आपसात लढवण्यासाठी ही घटना घडली आहे.” राहुल गांधींनी स्पष्ट करावे कोण आणि कुणाचे भाऊ? अजून कितीवेळ या असल्या दहशतवादी भाईंचा चारा व्हायचे आहे? रामरहिम, गंगा- जमुना तहजिब केवळ एकाच बाजूने, एककलमी कार्यक्रम म्हणून हिंदू राबवतच आला आहे? पण, त्या 26 कुटुंबाचे दुःख, वाताहत याचे गांभीर्य राहुल आणि काँग्रेसला आहे का? राहुल गांधी यांनी त्यांच्या ‘मोहब्बतचे दुकान’ आता खरंच पाकिस्तानमध्ये थाटावे.
 
धर्मांध दहशतवाद्यांनी केवळ हिंदू आहेत, म्हूणन 26 हिंदूंना त्यांच्या पत्नी अणि लहान बालकांसमोर मारले. ते पुरुष मुस्लीम आहेत का, हे तपासण्यासाठी पॅन्टही उतरवल्या. मात्र, काँग्रेसचे महाराष्ट्राचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, “दहशतवाद्यांना इतका वेळ असतो का, की ते कुणाचा धर्म विचारून मारतील.” याचाच अर्थ वडेट्टीवारांच्या मते, दहशतवादी हल्ल्यांतील पीडित हिंदू कुटुंब खोट बोलत आहेत. पीडितांना खोटे ठरवून दहशतवादी हे ‘धर्मांध’ नव्हतेच, असे सांगण्याचा खटाटोप वडेट्टीवारांनी का केला? दुसरीकडे कर्नाटकमधील काँग्रेस पक्षाच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, भारत-पाकिस्तान युद्धाबाबत मत व्यक्त केले की, पाकिस्तानसोबत युद्ध नको. सिद्धरामय्या यांना कशासाठी पाकिस्तानचा इतका पुळका आहे? तसेच, त्या दहशतवाद्यांनी महिलांना हातही लावला नाही, असे शरद पवारांना एका महिलेने सांगितले, असे खुद्द शरद पवार अगदी अगत्याने म्हणाले.
 
दहशतवाद्यांनी महिलांना मारले नाही, केवळ हिंदू पुरुषांना मारले, याबद्दल त्यांचे गदगद अंतकरणाने हिंदूंनी उपकार मानायचे का? राहुल गांधी, शरद पवार, विजय वडेट्टीवार आणि सिद्धरामय्यांसह त्यांचे सर्व समविचारी, यांनी जरा स्वतःचा अंतरात्मा तपासून पाहावा. मतांच्या लाचारीसाठी किती हे लांगूलचालन? इतके की, पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात बोललो तर भारतीय मुसलमान नाराज होतील, असेच या सगळ्यांनी गृहीत धरले आहे. आता हे गृहीतक आहे की, सत्य ही गोष्ट अलहिदा. या घटनेनंतर एक मात्र सिद्ध झाली की, देशाचा आणि हिंदूंचा शत्रू सीमेपारच नाही, तर भारताच्या आतमध्येही दबा धरून बसला आहे. समाजकारण, राजकारण आणि प्रसारमाध्यमात असलेल्या, देश शत्रूंचे उघड किंवा छुपे समर्थन करणार्‍या विषारी सापांचे काय करायचे? हाच प्रश्न आहे.
 
त्यांना ठेचायलाच हवे
 
धर्म न मानणार्‍या कम्युनिस्ट पक्षाचाही अल्पसंख्याक प्रकोष्ट आहे. या प्रकोष्टचा अखिल भारतीय अध्यक्ष आहे इफ्तेखार महमूद. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत वक्तव्य करताना, त्याने नेहमीचे पालुपद आळवले. फक्त यात ‘इस्लाम खतरे मे’ किंवा ‘संविधान खतरे मे हैं।’ ऐवजी, ‘देशाची सुरक्षा खतरे मे हैं।’ असे तो म्हणाला.
 
पण, ही सुरक्षा कुणामुळे ’खतरे’ मध्ये आहे हे सांगताना, त्याने आरोप केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर. काय म्हणावे? पाकिस्तानचे धर्मांध दहशतवादी आणि या दहशतवाद्यांना थारा देणारे काही स्थानिक देशद्रोही धर्मांध मुसलमान, यांचा निषेध त्याने केला नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये हिंदूंनाच आरोपी ठरवायचे, असे हे कारस्थान.
 
दुसरीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधातील मोर्च्यामध्ये, कम्युनिस्ट पक्षाचा नेता कैलाश प्रसाद याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असा नारा दिला. तर कम्युनिस्ट पक्षाचा नेता आफताब आलम याची तर कथाच वेगळी. कम्युनिस्ट पक्षाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, भारतात नेतागिरी करणारा आणि संविधान किंवा इस्लाम कसा खतरे मे हैं, असा राग आळवणार्‍या या आलमने 2012 साली पाकिस्तानच्या सायना कौसरशी निकाह केला.
 
ही कौसर पकिस्तानमध्ये प्राध्यापक आहे, तर त्यांची मुलगी आफिया ही कराचीमध्ये पाचवीत शिकते. कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलम नेहमीच पाकिस्तानमध्ये जात असे. सगळे सुखनैव सुरू होते. पहलगाम हल्ल्यानंतर त्याला पाकिस्तानमध्ये जाणे किंवा त्याच्या पत्नी मुलीला भारतात येणे शक्य नाही. तसेही भारताचे नागरिकत्व अबाधित ठेऊन पाकिस्तानातील व्यक्तीशी विवाह करणे, भारतात येऊन भरपूर मुलांना जन्म देणे, भारत सरकारच्या सुविधा उपभोगणे, इतके सगळे करून, भारतविरोधी आणि हिंदूविरोधी भूमिका घेणे आणि पाकिस्तानचे समर्थन करणे, असे कृत्य करणार्‍या कितीतरी जणांचे भयंकर सत्य आता उघडे पडले.
 
भारतात हे कटकारस्थान, गुपचूप गंगा जमुना तहजिबच्या अंतर्गत सुरू होते. आपल्या डोळ्यांवरच नाही, तर मनबुद्धीवर कसलीही पट्टी आहे? सीमेबाहेर आणि अंतर्गतही गृहयुद्ध पुकारणार्‍या या असल्या लोकांवर, आता कडक कारवाई होणे गरजेचेच आहे. या देशद्रोह्यांना ठेचायलाच हवे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121