"शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहावं वाटतं": आमिर खान म्हणतो 'महाभारत' हेच शेवटचं भव्य स्वप्न असू शकतं!

    01-Jun-2025   
Total Views |

i want to keep working till my last breath aamir khan says mahabharat could be his last grand dream



 मुंबई : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी आपल्या करिअरमधील कदाचित शेवटच्या चित्रपटाचा संकेत दिला आहे. 'महाभारत' हे भव्य दिव्य सिनेमा त्यांचं अंतिम आणि सर्वात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असू शकतं, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. “माझं स्वप्न आहे की मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहावं…,” असं ते म्हणाले.

‘सितारे जमीन पर’ फेम अभिनेता राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलत होता. या संवादात त्यांनी 'महाभारत' या महाकाव्याचं महत्त्व, त्याचा दर्जा, त्यातील भावना आणि भव्यता यावर भर दिला. “या कथेत जे काही आहे, ते जगात सापडतं. भावना, स्तर, संघर्ष, तत्वज्ञान, सगळं काही आहे 'महाभारत' मध्ये,” असं ते म्हणाले.

आमिर पुढे म्हणाले, “कदाचित हा चित्रपट केल्यानंतर मला असं वाटेल की आता आणखी काही करायचंच राहिलेलं नाही. या चित्रपटाचं जे साहित्य आहे, त्याचं वजनच इतकं मोठं आहे की त्यानंतर काही उरणारच नाही.”

आमिरने ही इच्छा व्यक्त केली की, “माझा शेवट माझ्या शूज घालूनच व्हावा – म्हणजे काम करत असताना. पण जर विचारलंत, तर माझ्या डोक्यात याच एका गोष्टीचा विचार येतो. कदाचित 'महाभारत' केल्यावर असं वाटेल की आता काही शिल्लकच नाही.”

या आधी The Hollywood Reporter ला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी 'महाभारत' या चित्रपटावर आपली दीर्घकालीन योजना मांडली होती. “हे माझं सर्वात मोठं स्वप्न आहे. कोणत्या भूमिकेसाठी कोण कलाकार योग्य ठरेल, ते पाहावं लागेल,” असं त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले होते की, “'महाभारत' एकाच चित्रपटात सांगणं शक्य नाही. त्यामुळे हे अनेक चित्रपटांच्या स्वरूपात असेल. हे मोठ्या प्रमाणात, खूप मोठ्या स्केलवर साकारावं लागेल.” या भव्यतेच्या मागे असलेल्या मेहनतीचा उल्लेख करत ते म्हणाले की, “यासाठी कदाचित एकापेक्षा अधिक दिग्दर्शक लागतील. वेळेच्या मर्यादेत पूर्ण करायचं असेल, तर टीम मोठी लागेल.”

दरम्यान, आमिर सध्या आपला आगामी क्रीडाविषयक चित्रपट ‘सितारे जमीन पर’ साठी सज्ज होत आहे, जो २० जून २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय, तो रजनीकांत यांच्या ‘कुली’ या चित्रपटात देखील झळकणार असून हा चित्रपट लोकेश कनगराज दिग्दर्शित करत आहेत.

आमिरने ‘लाहोर १९४७’ या कालपटाचे निर्मितीही स्वीकारली आहे, ज्याचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत असून यात सनी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.



अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

जगन्नाथ रथयात्रा LIVE : ३०० टन वजन, ४५ फूट उंचीचा १६ चाकी जगन्नाथाचा रथ दरवर्षी बनवून नष्ट का केला जातो? काय आहे कारण?

भगवान जगन्नाथ यात्रेची सुरुवात दि. २७ जून रोजी ओडिशात सुरू होत आहे. ही पुरीतील वर्षानुवर्षांची पारंपारीक रथयात्रा आहे. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी दोनशेहून अधिक लोक फक्त ५८ दिवसांत ४५ फूट उंच तीन रथ तयार करतात. दरवर्षी तीन नवीन रथ बनवले जातात. नंदीघोष – भगवान जगन्नाथसाठी, या रथाला गरुड्ध्यज असेही संबोधले जाते. हे रथ बनवण्यासाठी तब्बल ८३२ लाकडांचा वापर केला जातो त्याचबरोबर याचे वजन २८० ते ३०० टन एवढे असते. या रथाची उंची ४५ फूट सहा इंच तर लांबी ३४ फूट सहा इंच ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121