काँग्रेस आणि वड्डेट्टीवार आतंकवाद्यांना क्लीन चीट देताहेत! भाजपचा हल्लाबोल

    28-Apr-2025
Total Views | 20
 
Vijay Wadettivar
 
मुंबई : काँग्रेस आणि विजय वड्डेट्टीवार आतंकवाद्यांना क्लीन चीट देत आहेत, असा हल्लाबोल भाजपकडून करण्यात आला आहे. जात विचारण्यासाठी दहशतवाद्यांकडे वेळ असतो का? असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. यावर भाजपने त्यांना खडेबोल सुनावले आहे.
 
भाजपच्या 'एक्स' अकाऊंटवरील पोस्टमध्ये काँग्रेस आणि वडेट्टीवारांवर निशाणा साधण्यात आला आहे. "पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मारले गेलेल्या निष्पाप हिंदूंच्या कुटुंबियांनी, जाहीरपणे प्रसारमाध्यमांना सांगितले आहे की, आतंकवाद्यांनी मारण्यापूर्वी नाव, धर्म विचारलe. परंतू, काँग्रेसमधून रोज कुणी ना कुणी प्रसारमाध्यमांवर येऊन हल्ल्यातील मृतकांच्या कुटुंबियांना खोटं ठरविण्याचा प्रयत्न करत आहे."
हे वाचलंत का? -  पहलगाम हल्ल्यावरून वडेट्टीवार बरळले! म्हणाले, "जात विचारण्यासाठी दहशतवाद्यांकडे वेळ..."
 
"काँग्रेस आघाडीच्या या व्होट जिहादला जनतेने वारंवार नाकारले आहे. तरीही तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी काँग्रेस अजूनही तेच घाणेरडे राजकारण करत आहे. अनेकांनी आपल्या घरातील व्यक्ती गमावल्या आहेत. मात्र, काँग्रेस आणि वड्डेट्टीवार आतंकवाद्यांचे सहानभूतीकार बनून आतंकवाद्यांना क्लीन चीट देत आहेत," असा घणाघात भाजपकडून करण्यात आला आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार ३७१ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121