आजपासून दादरमध्ये रंगणार ७८वी वसंत व्याख्यानमाला!

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या मुलाखतीने होणार व्याख्यानमालेचे उद्धाटन

    12-Apr-2025
Total Views | 35

amar hind mandal
मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्राचे क्षितीज विस्तारणारी आणि नव्या विचारांची ओळख लोकांना करुन देणाऱ्या वसंत व्याख्यानमालेची सुरुवात आज दि. १२ एप्रिल पासून होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची मुलाखतीने या व्याख्यानमालेची सुरुवात होणार असून, राजीव जोशी आणि नेहा खरे अभिनेते अशोक सराफ यांच्या कला जीवनाचा प्रवास उलगडणार आहेत.

अमर हिंद मंडळाच्या ७८ व्या वसंत व्याख्यानमालेत अनेक मान्यवर विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. दि. १३ एप्रिल रोजी मुंबई मनपाचे आयुक्त भूषण गगराणी मुंबईच्या भवितव्यावर आपले मत मांडणार आहेत. दि. १४ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महामार्ग विकासाचा या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार रवि आमले दि. १५ एप्रिल रोजी रॉ: गुप्तचर यंत्रणा आणि आपण या विषयी रंजक माहिती देणार आहेत. दि. १६ एप्रिल रोजी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू ' भारत महासत्ता बनताना ' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दि. १७ एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती मृदुला भाटकर 'कोर्टाची पायरी आणि नागरिक' या विषयावर श्रोत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. दि. १८ एप्रिल रोजी मृदुला दाढे निवडक हिंदी आणि मराठी संगीतकारांच्या शैलींचे विश्लेषण आपल्या ' तरी असेल गीत हे!' या कार्यक्रमात करणार आहेत.
 
दादार पश्चिम इथल्या अमरवाडी येथे ही वसंत व्याख्यानमाला पार पडणार असून, या व्याख्यानमालेला लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121