अ. भा. सा. प. पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे ‘अहिल्यादेवी लेखन स्पर्धेचे’ आयोजन

    26-Aug-2024
Total Views | 46

अहिल्यादेवी  
 
मुंबई - अखिल भारतीय साहित्य परिषद (साहित्य भारती), पश्चिम महाराष्ट्र प्रांतातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘अहिल्यादेवी लेखन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. शालेय गट, महाविद्यालयीन गट आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. शालेय गटासाठी अहिल्यादेवी जीवन व कार्य, अहिल्यादेवी : आदर्श प्रशासक, अहिल्यादेवी : एक समाज सुधारक महाविद्यालयीन गटासाठी अहिल्यादेवी आणि औद्योगिकरण, अहिल्यादेवी एक मुत्सद्दी राजकारणी, अहिल्यादेवी आज असत्या तर आणि खुल्या गटासाठी अहिल्यादेवींचे सामाजिक व सांस्कृतिक योगदान, स्त्रीत्वाचा जागर करणाऱ्या अहिल्यादेवी, धर्मयोगिनी अहिल्यादेवी हे विषय आहेत. प्रत्येक गटातील प्रथम विजेत्या स्पर्धकासाठी ३००० रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, द्वितीय विजेत्या स्पर्धकासाठी २००० रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र आणि तृतीय विजेत्या स्पर्धकासाठी १००० रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरूप असणार आहे. स्पर्धेसाठी लेख पाठविण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121