अण्णाभाऊ साठे यांची कन्या शांताबाई साठे यांचे निधन!
05-May-2025
Total Views |
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, आपल्या गीतांच्या माध्यमातून लोकमानस जागृत करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या शांताबाई साठे यांनी वयाच्या ९०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रविवार दि. ४मे रोजी कांदिवली येथील सेव्हन स्टार रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. बोरिवली येथील महापालिकेच्या दौलतनगर स्माशनभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
साहित्य निर्मितीसह वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय असणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या वाणीतून समाजमनाची मशागत केली. त्यांच्या कन्या शांताबाई साठे या आयुष्यभर अविवाहीत राहिल्या. सामाजिक कार्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व वाहिले होते. १९८४-८५ या कालावधीत त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या नाटकात सुद्धा काम केले. 'पानिपात' कार विश्वास पाटील यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत शांताबाई साठे यांच्या आठवणींना उजाळा दिला. घाटकोपरच्या चिरागनगरच्या झोपडपट्टीत १९५८च्या दरम्यान अण्णा भाऊ साठे यांनी फकिरा कादंबरी लिहीत होते. तीन महिने सतत अहोरात्र लेखन करुन शेवटी अण्णाभाऊ साठे यांची प्रकृचती ढासळली. तेव्हा याच शांताबाईंनी त्यांना सावरले होते असे मत विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.