नवी दिल्ली:एअर इंडियाची विमान सेवा ८ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे. तर इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता याचा मोठा परिणाम भारतावरही होत आहे. यामुळे इस्त्रायला जाणारी एअर इंडियाची सर्व विमाने रद्द करण्यात आली आहे.
तर या विमानांची उड्डाने ८ ऑगस्टपर्यंत रद्द असणार आहेत. याबाबत एअर इंडियाकडून जाहिर करण्यात आले आहे. तसेच या एअर इंडियाच्या विमानातून तेलाची ने, आण करण्यात येत होती. तसेच एअर इंडियाने प्रवाशांसाठी री- सिटिंग आणि कॅन्सलेशन चार्जेसवर एकाचवेळी सूट देण्याचे देखील घोषित केले आहे.
एअर इंदियाच्या एअरलाईंन्सने प्रवाशांना सुचित केले आहे, या कालावधीमध्ये कोणत्याही समस्येसाठी २४/७ सेंटरशी संपर्क साधू शकतात. तर प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल एअर इंडिया कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. आणि प्रवाशांच्या बुकिंगवर रिशेड्युलिंग कॅन्सलेशनवर सूट दिली आहे.