आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर उकळत्या पाण्याने हल्ला

    01-Aug-2024
Total Views | 61
 
Attack on Police

मुंबई (प्रतिनिधी) : (Attack on Police) अंगावर उकळते पाणी फेकल्याने भाईंदर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकासह सहाजण गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच मीरा-भाईंदरमध्ये घडली. भाईंदर (प) येथील गीता नगर भागात असलेल्या वालचंद प्लाझा इमारतीच्या बी-विंगमधील फ्लॅट क्रमांक २०४ मधून मंगळवारी हा हल्ला झाला.

हे वाचलंत का? : राज ठाकरेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!

एका ३९ वर्षीय महिलेवर बॅट, गॅस सिलिंडर आणि कुकरने अमानुष हल्ला करणाऱ्या काही सदस्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक सोमवारी दुपारी या ठिकाणी गेले होते. संबंधित चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर मंगळवारी पोलिसांचे पथक घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी आणि आरोपींना अटक करण्यासाठी गेले असता आरोपींनी दार उघडले नाही. तेव्हा पोलिसांच्या पथकाने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी उकळते पाणी त्यांच्यावर फेकले. यात एक अधिकारी आणि पाच हवालदार गंभीर भाजले.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. तर पोलिस पथकावर हल्ला केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना भाईंदर येथील भारतरत्न भीमसेन जोशी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121