आजच्या परिस्थितीला उबाठाची २५ वर्षे जबाबदार!

आशिष शेलारांचा घणाघात

    08-Jul-2024
Total Views | 102
 
UBT
 
मुंबई : मुंबईची आजची परिस्थिती आणि मुंबईकरांना होणाऱ्या त्रासाला उबाठा गटाची २५ वर्षे जबाबदार आहेत, असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागी पाणी साचले असून वाहतूक सुविधा ठप्प झाली आहे.
 
आशिष शेलार म्हणाले की, "लोकसभेच्या निवडणुका संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही नाले सफाईच्या कामांची पाहणी केली. त्याचवेळी आम्ही हे निदर्शनास आणून दिलं की, कंत्राटदारांनी दिलेले नालेसफाईचे आकडे फसवे आहेत. त्यात काहीही सत्यता नाही. छोटे नाले आणि मोठ्या नाल्यांतून काढलेला गाळ ज्या क्षेपणभूमीवर टाकला जातो ती खाजगी क्षेपणभूमी आहे. त्याची कुठलीही पडताळणी नाही."
 
हे वाचलंत का? -  पालिका व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर!
 
"मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हलगर्जीपणा केला आहे. कंत्राटदारांनी चोरी केली आहे. त्यामुळे गेल्या २५ वर्षात उबाठा गटाने मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून ज्या गोष्टी करणं आवश्यक होत्या त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्याचाच परिणाम म्हणून मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागत आहे," असेही ते म्हणाले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

कायद्याच्या राजवटीने शासित असलेल्या देशात जातीवर आधारित कोणताही भेदभाव मान्य नाही, असे गुरूवार दि.१७ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अय्यनार मंदिरात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या (एससी) भाविकांना अडविल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने अरियालूर जिल्हा पोलिस अधीक्षकांना आणि उदयारपलयम महसूल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, “पुथुकुडी येथील अय्यनार मंदिर प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या भाविकांना आडवू नये आणि त्यांना उत्सवात सहभागाची संपूर्ण मुभा दिली जावी.”..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121