मुंबई : आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात गुरुवार, १७ जुलै रोजी तुफान हाणामारी झाली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "घडलेली घटना अतिशय चुकीची आहे. ही घटना बिलकुल योग्य नाही. विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या अंतर्गत हा सगळा परिसर येतो. त्यामुळे माननीय अध्यक्षांनी आणि सभापतींनी याची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात कडक कारवाई करावी, अशी विनंती मी त्यांच्याकडे केली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे या विधानसभेला शोभणारे नाही. त्यामुळे यावर निश्चितपणे कारवाई झालीच पाहिजे."
जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी विधीमंडळाच्या तळमजळ्यावर हाणामारी केली. तसेच यावेळी त्यांनी एकमेकांना शिवीगाळही केली. दरम्यान, तेथील सुरक्षारक्षकांनी या कार्यकर्त्यांना सोडवले. या घटनेनंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....