राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत कोण मारणार बाजी?

    24-Jul-2024
Total Views | 76
NATAK
 
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ३४ व्या राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी २४ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर येथे ही फेरी होणार आहे. या वर्षी या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी मी नथुराम गोडसे बोलतोय, जर तरची गोष्ट, मर्डरवाले कुलकर्णी, चाणक्य, गालिब, २१७ पद्मिनी धाम, जन्मवारी, अस्तित्व आणि यदा कदाचित रिटर्न्स या ८ नाटकांची निवड झाली आहे.
 
२४ जुलै रोजी मी नथुराम गोडसे बोलतोय, २६ जुलै रोजी जर तरची गोष्ट, २८ जुलै रोजी मर्डरवाले कुलकर्णी, २९ जुलै रोजी चाणक्य, ३० जुलै रोजी गालिब, ३१ जुलै रोजी २१७ पद्मिनी धाम, १ ऑगस्ट रोजी जन्मवारी, २ ऑगस्ट रोजी अस्तित्व, ३ ऑगस्ट रोजी यदा कदाचित रिटर्न्स अशा स्वरूपात ही फेरी पार पडणार आहे.
 
१९८६-८७ साली सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ‘मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा’ सुरू करण्यात आल्या. दरवर्षी साधारणपणे २५ ते ३० व्यावसायिक नाट्य संस्थांचा या स्पर्धेत सहभाग असतो. डिसेंबर महिन्यात प्राथमिक फेरीसाठी प्रवेशिका मागविण्यात येतात. यातूनच,अंतिम फेरीसाठी नाट्यसंस्थांची निवड करण्यात येते.
अग्रलेख
जरुर वाचा
मनसेला झटका! अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

मनसेला झटका! अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

(Avinash Jadhav) मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून मराठीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (८ जुलै) मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. सोमवारपासून पोलिसांनी मनसे आणि उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी पहाटे पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश ..

मेट्रोला विलंब झाल्याने घाटकोपर स्थानकात तुफान गर्दी

मेट्रोला विलंब झाल्याने घाटकोपर स्थानकात तुफान गर्दी

मेट्रोचे डबे वाढविण्याची प्रवाशांची मागणी अतिरिक्त कोच खरेदीसाठी मेट्रो वनचा प्रस्ताव मुंबई मेट्रो मार्ग १ वर तांत्रिक बिघाडामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार,दि.७ रोजी प्रवाशांची विशेषतः कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांची प्रचंड तारांबळ उडाली. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने बघता बघता घाटकोपर स्थानकासह इतर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने गर्दी वाढली आहे. टार्गेट स्पीड गाठू न शकल्याने एक ट्रेन ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121