'संधीचं सोनं करणं म्हणजे...' नम्रता संभेरावचं काम पाहून भारावला ‘हा’ अभिनेता

    08-May-2024
Total Views | 58

namrata  
 
 
मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री नम्रता संभेराव सध्या ‘नाच गं घुमा’ (Nach Ga Ghuma) या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात तीने मोलकरणींचे प्रतिनिधीत्व करणारी व्यक्तीरेखा (Nach Ga Ghuma) साकारली आहे. तिच्या या भूमिकेचे सर्वच स्तरांतून कौतुक होत असताना रंग माझा वेगळा मालिका फेम अभिनेता आशुतोष गोखले याने नम्रताचे कौतुक करणारी विशेष पोस्ट केली आहे.
 
आशुतोषने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये 'नाच गं घुमा'चे एक पोस्टर शेअर केले आहे आणि लिहिले की, 'मिळालेल्या संधीचं सोनं करणं म्हणजे काय हे ती संधी शोधू पाहणाऱ्या प्रत्येक कलाकाराने नम्रता संभेराव हिचं "नाच गं घुमा" चित्रपटामधलं काम बघून शिकावं. नम्रता ही एक चांगली अभिनेत्री आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. पण एखाद्या कामाचं, व्यक्तिरेखेचं आणि प्रामुख्याने मिळालेल्या त्या एका संधीचं मोल असणं म्हणजे काय हे तिने केलेल्या कामात जो खरेपणा, जो प्रामाणिकपणा आहे त्यातून जाणवत राहतं.'
 

namrata  
 
परेश मोकाशी दिग्दर्शित 'नाच गं घुमा' चित्रपटात मुक्ता-नम्रता यांच्यासह सारंग साठ्ये, सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने आणि बालकलाकार मायरा वायकुळ अशी स्टारकास्ट आहे. हिरण्यगर्भ निर्मित हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित झाला होता. आत्तापर्यंत या चित्रपटाने ८ कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121