मुंबई (प्रतिनिधी) : आद्य शंकराचार्य जयंती निमित्त अखंड भारत व्यासपीठ आणि परम मित्र पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने 'अयोध्या आंदोलनाचा ताळेबंद' हा ग्रंथ प्रकाशित होत आहे. डॉ. अशोकराव मोडक आणि डॉ. प्रशांत धर्माधिकारी लिखित या ग्रंथाचे प्रकाशन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या शुभहस्ते होणार असून विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा.कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांची उपस्थिती असेल. सदर कार्यक्रम रविवार, दि. १२ मे रोजी संध्याकाळी ५.३० वा. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह, सर्व्हीस रोड, इटरनिटी टॉवर गेट नं. २, तीन हात नाका, ठाणे (प) येथे संपन्न होईल.