'भारतमातेची लेकरे' आता हक्काने तिच्या कुशीत राहतील

निर्वासितांना मिळालेल्या नागरिकत्वावर आलोक कुमार यांचे प्रतिपादन

    17-May-2024
Total Views | 146

VHP-CAA

मुंबई (प्रतिनिधी) :
"पाकिस्तानात छळ झालेल्या आणि आपल्या धर्म, जीवन व शालीनतेच्या रक्षणासाठी भारतात आलेल्या ३०० निर्वासितांना भारतीय नागरिकत्व (VHP-CAA) मिळाले. हे स्वागतार्ह पाऊल आहे. आता हे सर्वजण, भारताचे नागरिक आणि भारतमातेची लेकरे, हक्काने भारत मातेच्या कुशीत राहतील.", असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आलोक कुमार यांनी व्यक्त केले. सीएए अंतर्गत बुधवारी १४ जणांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले. त्यावर आलोक कुमार यांनी विहिंपची भूमिका मांडली.

ते म्हणाले, ही भारताची परंपरा आहे. इतिहास साक्षी आहे की, जगाच्या कोणत्याही भागातून प्रताडित होऊन आलेल्या निर्वासितांना भारताने प्रेम, आदर आणि पाठिंबा देत भारतात स्थान दिले.

हे वातलंत का? : "कोणीही CAA हटवू शकत नाही, ही मोदींची गॅरंटी आहे"

ही श्रीरामाची परंपरा आहे. रामायणात विभीषण प्रभू श्रीरामाच्या छावणीकडे येत असताना सुग्रीवाने त्यांना पकडून बांधून ठेवण्याचा सल्ला दिला होता. पण त्यावेळी श्रीराम म्हणाले, "मम पन सरनागत भयहारी", म्हणजेच शरणागतीचे भय दूर करण्याचे माझे व्रत आहे.

विहिंपच्या कार्यकर्त्याना आवाहन करत पुढे ते म्हणाले, भारतात राहणाऱ्या सर्व हिंदू, शीख, जैन, बौद्ध निर्वासितांना मदत करणे आणि त्यांना भारतीय नागरिकत्व मिळवून देणे अपेक्षित आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार ३७१ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121