"राऊत तुम्हाला बाळासाहेबांनी जोड्यानं हाणलं असतं"

ज्योती वाघमारेंनी संजय राऊतांना सुनावले खडेबोल

    19-Apr-2024
Total Views | 178
jyoti
 
मुंबई : संजय राऊत यांनी भाजपच्या अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा यांच्यावर खालच्या थराला जाऊन टिका केली होती. त्यावर शिवसेनेच्या नेत्या डाँ. ज्योती वाघमारे यांनी संजय राऊत यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. आपल्या एक्स अकाउंटवर पोस्ट करत त्यांनी संजय राऊतांना खडेबोल सुनावले आहेत. आज जर बाळा साहेब असते तर राऊतांना जोड्यानं हाणलं असतं असं त्या यावेळी म्हणाल्या.
 
एखाद्या महीलेबद्दल इतक्या खालच्या थराला जाऊन टिका संजय राऊतांनी केली. हे हा महाराष्ट्र खपवुन घेईल का ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. जिजाऊ, सावित्री आणि रमाईच्या महाराष्ट्रात महीलांचा असा अपमान होताना उद्धव ठाकरे गप्प का आहेत असा सवालही त्यांनी विचारला आहे. ज्योती वाघमारेंनी यावेळी सुषमा अंधारे यांचाही समाचार घेतला आहे.
 
हिंदु देवतांचा अपमान करणाऱ्या, आई बसली अस म्हणत अचकटविटकट हावभाव करणाऱ्या आणि महीला सन्मानाच्या गोष्टी करणाऱ्या सुषमा अंधारे आता कुठे आहेत असा सवालही ज्योती वाघमारे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे मुग गिळुन का बसल्या आहेत असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
 
रावण सुद्धा विद्वान होता पण त्याची सोन्याची लंका सितामाईचा अपमान केल्याने जळुन खात झाली. हस्तिनापुरचे साम्राज्यही द्रौपदीच्या अपमानामुळे धुळीस मिळाले. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीची लंका ही सुद्धा संजय राऊतांच्या बेताल वकत्यव्यामुळे जळुन जाणार आहे. कारण महाराष्ट्र महीलांचा अपमान सहन करणार नाही असंही पुढे ज्योती वाघमारे यांनी म्हटलं आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121