मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Rudraksh Wale Baba News) उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे जानेवारी महिन्यात महकुंभमेळा आयोजिक करण्यात आला आहे. त्या निमित्ताने देशभरातून साधू-संत, श्रद्धाळू प्रयागराज येथे येऊ लागले आहेत. उत्तर प्रदेश सरकारची तयारी सुद्धा मोठ्याप्रमाणात सुरु आहे. अशातच महाकुंभासाठी आलेले 'रुद्राक्ष वाले बाबा' सध्या आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत. गीतानंद गिरी हे त्यांचे मुळ नाव असून ते सध्या प्रयागराजमध्ये वास्तव्यास आहेत. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी आपल्या १२ वर्षांच्या अध्यात्मिक प्रवासातील अंतर्दृष्टी सामायिक केली.
गीतानंद गिरी हे भगवान शिवाचे निस्सिम भक्त आहेत. त्यांची आध्यात्मिक तपस्या अलाहाबाद येथे झालेल्या अर्ध कुंभ मेळ्यादरम्यान सुरू झाली आणि सहा वर्षांत पुढील अर्ध कुंभ मेळ्यात ती समाप्त होईल. जेव्हा त्यांनी आपल्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात केली तेव्हा त्याचे वजन ११ किलोग्रॅम होते आणि सध्या त्याचे वजन ४५ किलोग्रॅम झाले आहे. त्यांनी पुढे नमूद केले की त्यांनी सव्वा लाख 'रुद्राक्ष' पूर्ण करण्याची शपथ घेतली असून ते एकूण ९२५ माळांमध्ये विणलेले आहेत. आपली तपस्या राष्ट्र आणि सनातनच्या हिताची असल्याचे त्यांनी नमूद केले.